T20 World Cup : टीम इंडियाच्या फेल खेळाडूला घाबरली इंग्लंड! 6 मॅचमध्ये फक्त 80 रन... तरी सापळा रचला
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना इंग्लंडविरुद्ध होणार आहे. या सामन्याआधी इंग्लंडकडून माईंड गेम खेळायला सुरूवात झाली आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात गुरूवार 5 मार्चला टी-20 वर्ल्ड कपची सेमी फायनल होईल. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया आणि इंग्लंड यांनी एक-एक सामना गमावला आहे. भारताचा सुपर-8 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि इंग्लंडचा वेस्ट इंडिजविरुद्ध पराभव झाला.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
संपूर्ण टी-20 वर्ल्ड कपमध्ये अभिषेक शर्माची कामगिरी निराशाजनक झाली आहे. 6 इनिंगमध्ये अभिषेकने फक्त 80 रन केल्या आहेत, ज्यात झिम्बाब्वेविरुद्ध 55 रन आहेत. सुरूवातीच्या तिन्ही सामन्यांमध्ये तर अभिषेक शून्य रनवर आऊट झाला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने 12 बॉल 15 आणि वेस्ट इंडिजविरुद्ध 11 बॉल 10 रन केल्या.
advertisement









