बजेट फोन खरेदीपूर्वी मोबाईलमध्ये काय चेक करतात लोक? तुमच्या बाबतीत हे खरंय की खोटं
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Counterpoint सर्वेक्षणानुसार, 20,000 रुपयांपेक्षा कमी किमतीचा स्मार्टफोन खरेदी करताना बॅटरी लाइफ हा सर्वात मोठा घटक आहे. यूझर्ससाठी ते का महत्त्वाचे होत आहे ते जाणून घ्या.
मुंबई : आजच्या काळात, स्मार्टफोनचा वापर फक्त कॉल करण्यासाठी किंवा मेसेज पाठवण्यासाठी केला जात नाही. तर मनोरंजनासाठी, डिजिटल पेमेंटसाठी आणि दैनंदिन कामे व्यवस्थापित करण्यासाठी केला जातो. आता फोन फक्त फोन नाही, तर लोकांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. आता बाजारात विविध प्रकारचे फोन येऊ लागले आहेत. पण फोन खरेदी करण्यापूर्वी लोक प्रथम काय शोधतात हे तुम्हाला माहिती आहे का?
advertisement
Counterpointच्या India Shipment Tracker (जानेवारी-मे 2025) नुसार, भारतात विकल्या जाणाऱ्या स्मार्टफोनची सरासरी बॅटरी क्षमता 5212mAh आहे. स्मार्टफोनवरील आपले अवलंबित्व वाढत असल्याने, बॅटरी लाइफबाबतच्या अपेक्षा देखील वाढल्या आहेत. सोशल मीडियापासून पेमेंट, फोटोग्राफी, व्हिडिओ स्ट्रीमिंग, नोट्स घेणे, ट्रान्सपोर्ट बुकिंग आणि एआय टूल्सपर्यंत सर्व गोष्टींसाठी यूझर्स फोनवर अवलंबून असतात. या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी, सुरळीत कामगिरी आणि मजबूत बॅटरी बॅकअप खूप महत्वाचे झाले आहे.
advertisement
सर्वात जास्त मागणी कोणत्या गोष्टीची आहे? : जेव्हा लोक नवीन स्मार्टफोन खरेदी करतात तेव्हा त्यांची निवड स्पष्ट असते. काउंटरपॉइंट रिसर्चच्या ग्राहक सर्वेक्षणानुसार, संपूर्ण बाजारपेठेत प्रोसेसर (SoC) अजूनही सर्वोच्च प्राधान्य आहे. परंतु 20,000 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या सेगमेंटमध्ये, बॅटरी लाइफ हा सर्वात महत्त्वाचा घटक बनला आहे. बजेट-फ्रेंडली डिव्हाइस निवडताना, लोकांना असा फोन हवा आहे जो संपूर्ण दिवस टिकेल.
advertisement
advertisement
advertisement
advertisement


