गुडीपाडव्याला का बनवता 'श्रीखंड-पूरी'? आवडीने खातो पण यामागचं कारण अनेकांना माहित नसेल
- Published by:Devika Shinde
Last Updated:
गुडीपाडवा म्हणजे हिंदू नवीन वर्षाची सुरुवात आणि कोणत्या ही नवीन गोष्टीची सुरुवात ही गोड पदार्थ खाऊनच करतात. शिवाय हा सण असल्यामुळे सहाजिकच गोड पदार्थ असणारच.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
पण प्रश्न असा की गुडीपाडव्यालाच 'श्रीखंड'ला महत्व का?गुढीपाडवा हा सण उन्हाळ्यात येतो. या काळात वातावरणात असलेल्या उष्णतेपासून शरीराला थंडावा आणि आराम मिळावा म्हणून श्रीखंड खाल्ले जाते. यामुळे शरीरातील शक्ती सुद्धा तग धरते. जाणकारांच्या मते ज्या व्यक्तीचे शरीर उन्हामुळे शुष्क झाले आहे, याच्या अंगात उर्जा नाही, उत्साह नाही त्या व्यक्तींचे शरीर श्रीखंड खाल्ल्यानंतर अगदी ताजेतवाने होते.








