हडपसरमधील तरुणाचा घेतला जीव; मग हरिद्वार गाठून लॉजमध्ये राहिला, पोलिसांकडून 20 महिने शोध, पण अखेर...

Last Updated:

गुन्हा केल्यानंतर वैभव जाधव पुण्याबाहेर पसार झाला होता. पोलीस गेल्या दीड वर्षांपासून अधिक काळ त्याचा माग काढत होते

20 महिन्यांनी आरोपी अटकेत (AI image)
20 महिन्यांनी आरोपी अटकेत (AI image)
पुणे: हडपसरमधील एका तरुणाची कालव्यात ढकलून हत्या केल्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपीला तब्बल २० महिन्यांच्या मोठ्या शोधमोहिमेनंतर पोलिसांनी जेरबंद केले आहे. हडपसर पोलिसांनी ही कारवाई उत्तराखंडमधील हरिद्वार येथे सापळा रचून केली. वैभव मनोज जाधव (वय २४, मूळ रा. छत्रपती संभाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो मे २०२४ पासून पोलिसांना गुंगारा देत होता.
नेमकी घटना काय होती?
५ मे २०२४ रोजी हडपसरमधील उन्नतीनगर भागातील कालव्यात विनोद मधुकर शार्दुल (वय ४५, रा. दिवा, ठाणे) नावाचा व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत सापडला होता. नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तातडीने त्याला ससून रुग्णालयात हलवले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला ही अपघाती घटना वाटली असली तरी, पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली. किरकोळ वादातून वैभव जाधवने विनोद शार्दुल यांना कालव्यात ढकलून दिले होते. ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
advertisement
हरिद्वारमध्ये कसा सापडला आरोपी?
गुन्हा केल्यानंतर वैभव जाधव पुण्याबाहेर पसार झाला होता. पोलीस गेल्या दीड वर्षांपासून अधिक काळ त्याचा माग काढत होते. तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तो उत्तराखंडमधील हरिद्वार येथे एका लॉजमध्ये नाव बदलून राहत असल्याचे निष्पन्न झाले. हडपसर पोलिसांचे एक पथक तातडीने हरिद्वारला रवाना झाले आणि गुरुवारी (२५ डिसेंबर) त्याला ताब्यात घेण्यात आले.
advertisement
परिमंडळ सहाचे उपायुक्त सागर कवडे आणि सहायक आयुक्त अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, गुन्हे निरीक्षक नीलेश जगदाळे, उपनिरीक्षक हसन मुलाणी आणि त्यांच्या टीमने ही धाडसी कारवाई केली. आरोपीला घेऊन पोलीस पथक पुण्याच्या दिशेने रवाना झाले असून, या हत्येमागील अधिक कारणांचा शोध पोलीस घेत आहेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
हडपसरमधील तरुणाचा घेतला जीव; मग हरिद्वार गाठून लॉजमध्ये राहिला, पोलिसांकडून 20 महिने शोध, पण अखेर...
Next Article
advertisement
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच, सुधारणा म्हणजे लोकांचे ओझे कमी करणे : पंतप्रधान मोदी
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच : पंतप्रधान मोदी
  • पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकार सामान्य नागरिकांचे जीवन सोपे करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

  • कर कायदे, श्रम संहिता, जीएसटी सुधारणा आणि उद्योगांसाठी नियम सुलभ करून प्रक्रिया सुलभ झाली.

  • मध्यमवर्गीयांना कर सवलत, एमएसएमईना कर्ज व सवलती, ग्रामीण रोजगारात टिकाऊ मालमत्ता निर्माण होत आहे.

View All
advertisement