Weather Forecast : राज्यात विचित्र हवामान, या 4 जिल्ह्यांना पुन्हा पावसाचा येलो अलर्ट, Video

Last Updated:

13 एप्रिल रोजी राज्यातील चार जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. उन्हाची तीव्रता वाढत असतानाच संभाव्य पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळू शकतो.

+
News18

News18

पुणे : भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सध्या राज्यात मिश्र हवामानाची परिस्थिती निर्माण झाली आहे. काही भागांत तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे, तर काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच काही भागांत दमट हवामान अनुभवायला मिळत आहे. 13 एप्रिल रोजी राज्यातील चार जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. उन्हाची तीव्रता वाढत असतानाच, संभाव्य पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळू शकतो.
advertisement
सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांची शक्यता असून, तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 13 एप्रिलला मुंबईतील कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. त्याठिकाणी मुख्यतः निरभ्र आकाश असू शकतं. त्याचबरोबर, पुढील 24 तासांत मुंबईतील तापमानात वाढ होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
advertisement
पुण्यातील कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. 13 एप्रिलला त्याठिकाणी मुख्यतः निरभ्र आकाश राहून दुपार किंवा सायंकाळनंतर अंशतः ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमधील कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. 13 एप्रिलला त्याठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
advertisement
नाशिकमधील कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. 13 एप्रिलला त्याठिकाणी मुख्यतः निरभ्र आकाश असू शकते. त्याचबरोबर, पुढील 24 तासांत तेथील तापमानात वाढ होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
नागपूरमधील कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. 13 एप्रिलला त्याठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांत सामान्यतः ढगाळ वातावरण राहून हलक्या पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
advertisement
राज्यातील सतत बदलणाऱ्या हवामानामुळे मानवी आरोग्यावर परिणाम होत आहे. वाढते तापमान आणि दमट हवामानामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पुढील दोन दिवस राज्यात दमट हवामान कायम राहण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी, विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी आरोग्याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Weather Forecast : राज्यात विचित्र हवामान, या 4 जिल्ह्यांना पुन्हा पावसाचा येलो अलर्ट, Video
Next Article
advertisement
Virar Rename as Dwarkadhish : ''अच्छा नाम नही है...'',विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची लाट
'अच्छा नाम नही है...',विरारचे नाव द्वारकाधीश? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची
  • विरारचं नाव ‘द्वारकाधीश’ करण्याचा प्रस्ताव चर्चेत

  • शहरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली

  • या संभाव्य नामांतराला उत्तर भारतीय समाजातील काही घटकांचा पाठिंबा

View All
advertisement