बांगलादेशबद्दलचा तो निर्णय टीम इंडियाला महाग पडणार! आशिया कपआधी वाढलं कॅप्टन सूर्याचं टेन्शन

Last Updated:

9 सप्टेंबरपासून युएईमध्ये आशिया कपला सुरूवात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय टीमची घोषणाही करण्यात आली आहे.

बांगलादेशबद्दलचा तो निर्णय टीम इंडियाला महाग पडणार! आशिया कपआधी वाढलं कॅप्टन सूर्याचं टेन्शन
बांगलादेशबद्दलचा तो निर्णय टीम इंडियाला महाग पडणार! आशिया कपआधी वाढलं कॅप्टन सूर्याचं टेन्शन
मुंबई : 9 सप्टेंबरपासून युएईमध्ये आशिया कपला सुरूवात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय टीमची घोषणाही करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडिया या स्पर्धेत खेळणार आहे. पुढच्या वर्षी भारतात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपची तयारी म्हणून आशिया कपकडे पाहिलं जात आहे, कारण टी-20 वर्ल्ड कपआधी टीम इंडियाला फार मॅच खेळण्याची संधी मिळणार नाही, पण या स्पर्धेआधी टीम इंडिया आणि कर्णधार सूर्यकुमार यादवचं टेन्शन वाढलं आहे.
टीम इंडियाने यावर्षी शेवटचा टी-20 सामना फेब्रुवारी महिन्यात खेळला होता, यानंतर भारतीय खेळाडू आयपीएलमध्ये वेगवेगळ्या टीमकडून टी-20 मॅच खेळले, पण आता आयपीएल संपूनही तीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे, त्यामुळे भारतीय खेळाडूंची मॅच प्रॅक्टिस झालेली नाही. भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवही शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहे.

बांगलादेशबद्दलचा निर्णय महागात पडणार?

खरंतर टीम इंडिया ऑगस्ट महिन्यात बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार होती. या दौऱ्यात 3 वनडे आणि 3 टी-20 मॅचची सीरिज होणार होती, पण भारत-बांगलादेश यांच्यातल्या बिघडलेल्या संबंधांमुळे ही स्पर्धा सप्टेंबर 2026 पर्यंत पुढे ढकलण्यात आली. टीम इंडिया बांगलादेश दौऱ्यावर गेली असती, तर त्यांना आशिया कपआधी पुरेशी मॅच प्रॅक्टिस मिळाली असती.
advertisement

इतर टीमची सीरिज सुरू

दुसरीकडे आशिया कपमध्ये खेळणाऱ्या बहुतेक टीम या मैदानामध्ये दिसत आहेत. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि युएई यांच्यामध्ये टी-20 ट्रॅन्ग्युलर सीरिज सुरू आहे, तर दुसरीकडे श्रीलंका झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर गेली आहे. या दौऱ्यातल्या 2 वनडेमध्ये श्रीलंकेचा विजय झाला असून 3 टी-20 मॅचची सीरिज बुधवारपासून सुरू होणार आहे.
आशिया कपसाठी पाकिस्तान, अफगाणिस्तान, युएई आणि श्रीलंका या टीम मॅच प्रॅक्टिससह मैदानात उतरणार आहेत, दुसरीकडे भारतीय खेळाडू मात्र मोठ्या विश्रांतीनंतर कमबॅक करणार आहेत, त्यामुळे ही विश्रांती टीम इंडियासाठी धोक्याची ठरू नये, अशीच अपेक्षा चाहत्यांना आहे.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
बांगलादेशबद्दलचा तो निर्णय टीम इंडियाला महाग पडणार! आशिया कपआधी वाढलं कॅप्टन सूर्याचं टेन्शन
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement