T20 World Cup मध्ये नव्या संघाची एंन्ट्री, बांगलादेशच्या बहिष्कारानंतर ICC लवकरच घोषणा करणार

Last Updated:

बांगलादेश क्रिकेट बोर्डाने भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या आगामी टी20 वर्ल्ड कप 2026 वर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेशच्या सरकराने खेळाडूंची सुरक्षा महत्वाची आहे, असे सांगत बांगलादेश क्रिकेट बोर्डाला आपल्या निर्णयावर ठाम राहण्यास सांगितले होते.

bangladesh bycott t20 world cup
bangladesh bycott t20 world cup
T20 World Cup 2026 : बांगलादेश क्रिकेट बोर्डाने भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या आगामी टी20 वर्ल्ड कप 2026 वर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेशच्या सरकराने खेळाडूंची सुरक्षा महत्वाची आहे, असे सांगत बांगलादेश क्रिकेट बोर्डाला आपल्या निर्णयावर ठाम राहण्यास सांगितले होते.त्यामुळे बांगलादेशच्या या भूमिकेमुळे आता ते वर्ल्ड कप स्पर्धेतू बाहेर झाले होते. त्यामुळे बांगलादेश वर्ल्ड कपमधून बाहेर झाल्याने आता स्कॉटलँड संघाची वर्ल्ड कप सर्धेत एंन्ट्री होणार असल्याची माहिती आहे.याबाबत लवकरच आयसीसीकडून घोषणा होणार आहे.
बुधवारी पार पडलेल्या बैठकीतही तोडगा निघू न शकल्याने आयसीसीने बांगलादेशला 48 तासाचा अल्टीमेटम दिला होता.या काळात बांगलादेश क्रिकेट बोर्ड बांगलादेश सरकारशी चर्चा करणार होते. पण या चर्चेत बांगसादेश सरकारने खेळाडूंची सुरक्षा महत्वाची आहे, त्याच्याशी तडजोड केली जाणार आहे. त्यामुळे बांगलादेशने भारतात सामने न खेळवण्याची आपली भूमिका कायम ठेवली आहे.त्यामु्ळे बांगलादेशेने टी20 वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकला होता. यामुळे आता बांगलादेश संघ स्पर्धेतू बाहेर झाला आहे.
advertisement
बांगलादेशला 14 देशांनी पाठिंबा नाकारला
दरम्यान बुधवारी देखील आयसीसीने ऑनलाईन तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत आयसीसीच्या 16 सदस्यांनी मतदान केलं होतं.ज्यामध्ये बांगलादेशच्या बाजूने दोन आणि उरलेल्या 14 जणांनी विरोधात मतदान केलं होतं. यामध्ये फक्त बांग्लादेश आणि पाकिस्तानने बांगलादेशच्या बाजूने मतदान केल्याची माहिती समोर आली होती.त्यानंतर या बैठकीनंतर आयसीसीने बांगलादेश क्रिकेट बोर्डाला आणखी 48 तासांचा एक अल्टीमेट दिला गेला होता.ज्यामध्ये त्यांना पुन्हा विचार करण्याची संधी देण्यात आली होती.
advertisement
आयसीसीच्या अल्टीमेटमनंतर आज बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अमीनुल इस्लाम यांनी बांगलादेश सरकारची बातचीत केली होती.या चर्चे दरम्यान बांगलादेश सरकारने आपल्या क्रिकेट संघात भारतात खेळण्यास मंजूरी दिली नव्हती. त्यानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने टी20 स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
नेमका वाद काय?
खरं तर बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदूवर होत असलेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर भारतात संतापाची लाट उसळली होती.त्यात आयपीएलमध्ये मुस्कफिजूर रहमान कोलकत्ता नाईट रायडर्स संघाने ताफ्यात घेतलं होतं. हे अनेक भारतीयांना पटले नसल्याने त्यांनी आयसीसीवर टीका केली होती. या टीकेनंतर मुस्तफिजूर रहमानची हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर बांगलादेशने सुरेक्षेचे कारण देऊन भारतात टी20 वर्ल्ड कपचे सामने खेळवण्यास नकार दिला होता. त्यामुळे इथून खरा वाद पेटला होता.
advertisement
टी20 वर्ल्ड कपमध्ये या संघाची एंन्ट्री
बांगलादेश आता स्पर्धेतून बाहेर झाल्यामुळे स्कॉटलँड संघाची वर्ल्डकपमध्ये एंन्ट्री होणार आहे. वर्ल्डकपला आता जवळपास 15 दिवस उरले आहेत.त्यामुळे आयसीसीकडे वेळ खूप कमी आहेत.त्यात स्कॉटलँड वर्ल्ड कपमध्ये क्वालिफाय होऊ शकला नव्हता.युरोपीयन क्लालिफायरमध्ये तो नेदरलँड,ईटली आणि जर्सी या संघांच्या मागे राहिला होता.त्यामुळे त्यांना वर्ल्ड कपच तिकीट मिळू शकलं नव्हतं. पण आता आयसीसीने बांगलादेशला बाहेर केल्यानंतर स्क्वॉटलँडला वर्ल्डमध्ये सरळ प्रवेश मिळाला आहे. पण याची अधिकृत घोषणा अद्याप झाली नाही आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup मध्ये नव्या संघाची एंन्ट्री, बांगलादेशच्या बहिष्कारानंतर ICC लवकरच घोषणा करणार
Next Article
advertisement
BMC Mayor BJP List: भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे चर्चेत, पाहा यादी..
भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे
  • मुंबईवर यंदा भाजप आपला झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाली आहे.

  • आरक्षण 'सर्वसाधारण महिला' प्रवर्गासाठी निघाल्याने भाजपमधील महिला नगरसेविकांमध्ये

  • भाजपच्या ४९ महिला उमेदवारांनी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे

View All
advertisement