advertisement

मिरा-वसईकरांनो एक्सप्रेससाठी लोकलची धावपळ आता थांबणार; रेल्वेचा असा आहे प्लॅन

Last Updated:

Vasai Road Terminus : मिरा-वसईकरांसाठी दिलासादायक बातमी असून एक्सप्रेस पकडण्यासाठी लोकलने धावपळ करण्याची गरज लवकरच संपणार आहे. नव्या योजनेनुसार थेट सुविधा उपलब्ध होणार असून प्रवाशांचा वेळ वाचणार आणि प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.

मे २०२६ पासून वसई रोड टर्मिनसच्या कामाला सुरुवात; प्रवाशांसाठी मोठा दिलासा
मे २०२६ पासून वसई रोड टर्मिनसच्या कामाला सुरुवात; प्रवाशांसाठी मोठा दिलासा
वसई : पश्चिम रेल्वेवरील वसई आणि विरारकरांची गेल्या काही वर्षांची प्रतीक्षा आता संपणार आहे. बाहेगावी जाण्यासाठी यांना वांद्रे किंवा कुर्ला, दादर आणि सीएसएमची रेल्वे स्थानकात जावे लागणार नाही. नेमका प्रशासनाने कोणता निर्णय घेतला असून कधीपासून प्रवास हा सोयीस्कर होणार आहे ते पाहमे महत्त्वाते ठरेल.
लांब पल्ल्याचा प्रवास आता आपल्या शहरातून
वसई-विरारकरांना आता बाहेरगावी प्रवास करण्यासाठी त्यांच्या शहरातून लांब पल्ल्यांच्या गाड्या पकडता येणार आहे. कारण वसई रोड रेल्वे स्थानकात अतिशय भव्य असे कोचिंग टर्मिनस उभ्यारण्यात येणार असून 2026 मे पासून या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होईल, असा दावा प्रशासनाने केला आहे.
आधी वसईतून हजारोच्या संख्येने प्रवासी बाहेरगावी जात असतात मात्र लोकलच्या गर्दीतून त्यांना वांद्रे किंवा, दादर, कुर्ला, सीएसएमची रेल्वे स्थानकात यावे लागत होते. त्यामुळे या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असून यावर वसई रोड रेल्वे स्थानकात टर्मिनस व्हावे अशी मागली गेल्या काही वर्षांपासून नागरिकांची होती. या मागणीचा विचार करुन प्रशासनाकडूनही प्रयत्न सुरु होते मात्र अनेक अडचणी येत असल्याने हे काम मार्गी लागत नव्हते.
advertisement
कधी पर्यंत होणार काम पूर्ण?
अखेर पालघरचे खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांनी नोव्हेंबर 2024 मध्ये पुन्हा एकदा या गोष्टींचा पाठपुरावा केंद्रात केला आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही मागणी मान्य झाल्याची घोषणाही केली होती. त्यानंतर 2026 पासून या टर्मिनसच्या कामाला प्रत्यक्श सुरुवात होणार असल्याती माहिती रेल्वे प्रशासनाने पत्राद्वारे दिली आहे. हे काम या वर्षीसुरु होऊन 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन ही करण्यात आलेले आहे.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
मिरा-वसईकरांनो एक्सप्रेससाठी लोकलची धावपळ आता थांबणार; रेल्वेचा असा आहे प्लॅन
Next Article
Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement