अमरावती : हिवाळ्याच्या दिवसांत थंडीमुळे अनेकांना तहान कमी लागते. याच काळात लोणची, पापड, चटपटीत पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले जातात. त्यात मीठ जास्त प्रमाणात असते. पण, आहारात जास्त मीठ घेतल्यास त्वचेला हानी पोहोचते. हिवाळ्यात आधीच हवामान कोरडे असल्याने त्वचेला इजा होते. मीठ जास्त प्रमाणात आहारात घेतल्यास ही समस्या अधिक वाढू शकते. आहारात मीठ जास्त घेतल्यास त्वचेच्या कोणत्या समस्या उद्भवतात जाणून घेऊया.



