पुणे : महाराष्ट्रभरात कडाक्याची थंडी जाणवत आहे. या थंडीत शरीराला उष्णता देणारे आणि ऊर्जा मिळवून देणारे पदार्थ खाणे आवश्यक असते. बाजरी, तीळ आणि गूळ यापासून बनवलेले पदार्थ थंडीच्या दिवसांत विशेष फायदेशीर ठरतात. बाजरीपासून बनवलेली भाकरी नेहमीच खाल्ली जाते. मात्र रोज-रोज भाकरी खाण्याचा अनेकांना कंटाळा येतो. त्यामुळे आज आपण बाजरीपासून झटपट तयार होणारा आणि चविष्ट असा पदार्थ पाहणार आहोत. तो म्हणजे बाजरीचे घावन. पुण्यातील गृहिणी वसुंधरा पाटुकले यांनी ही रेसिपी सांगितली आहे.
Last Updated: Jan 05, 2026, 13:16 IST


