कोल्हापूर : भारतातल्या खाद्य संस्कृतीमध्ये कोल्हापूरचा विशेष उल्लेख होतो. कोल्हापूरच जेवण म्हटलं की एरवी तांबडा पांढरा आपल्या समोर येतो. पण कोल्हापूरची शाकाहारी जेवणाचीही एक विशेष ओळख आहे हे तुम्हाला माहिती आहे का? करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी आणि जोतिबा रायाच्या दर्शनाला लाखो भाविकांची रेलचेल असते. काही वेळानं हे दर्शन झालं की भाविकांची पाऊल हळूहळू वळतात ते तांबड्या पांढऱ्या कड. पण कोल्हापुरकरांनी शाकाहारी जेवणाची परंपरा जपली आहे. अशाच कोल्हापुरातील एका खानावळीची आपण माहिती घेणार आहोत. ही खानावळ गेल्या 80 वर्षांपासून नागरिकांना अस्सल घरगुती पद्धतीच शाकाहारी जेवण खाऊ घालते.



