बीड: नियमित व्यायाम हा निरोगी आणि तंदुरुस्त आयुष्याचा पाया मानला जातो. आजच्या धावपळीच्या आणि ताणतणावाच्या जीवनशैलीमध्ये शारीरिक हालचाली कमी होत चालल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून लठ्ठपणा, हृदयविकार, मधुमेह, पाठदुखी यांसारख्या समस्या वाढत आहेत. अशा परिस्थितीत दररोज किमान अर्धा तास व्यायाम करणे हे शरीरासाठीच नव्हे तर मनासाठीही उपयुक्त ठरते. बीड जिल्ह्यातील आरोग्य तज्ज्ञ सुशील थेटे यांच्या मते व्यायामामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते.
Last Updated: November 28, 2025, 14:57 IST