जालना : वेगवेगळ्या संकटांमुळे शेती सातत्याने अडचणीत असते. परंतु, वेगवेगळे नावीन्यपूर्ण प्रयोग करून अनेक शेतकरी शेतीला फायदेशीर ठरवतात. कधीकधी शेती करताना अपयश देखील येते. परंतु, सातत्य ठेवले की यश मिळतेच. जालन्यातील लोणगीवच्या एका तरुण शेतकऱ्याने हेच सिद्ध केलेय. जसवंतसिंग शेखावत असे या प्रयोगशील शेतकऱ्यांचे नाव आहे. पाच एकर रताळी शेतीमधून त्यांना 11 लाखांचे उत्पन्न झाले आहे.



