कल्याण : हिवाळा सुरू झाला की केळीचा हंगाम सुरू होतो. त्यातच बाजारात केळफूल मिळते मिळते. केळफुलाची भाजी खाण्याचे अनेक फायदे आहेत. केळफूलात भरपूर फायबर, प्रथिने, लोह आणि इतर खनिजे असल्याने पचनक्रिया सुधारते, रक्तातील साखर नियंत्रित राहते, हिमोग्लोबिन वाढते, वजन कमी करण्यास मदत होते आणि मासिक पाळीतील समस्या आणि वेदना कमी होतात. ही भाजी अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वांनी परिपूर्ण असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. त्यामुळे थंडीत मोठ्या प्रमाणात या फुलांना मागणी असते. केळफुलाची भाजी कशी बनवायची पाहुयात.
Last Updated: Dec 22, 2025, 16:10 IST


