मुंबई : महाराणी ताराराणी या जैन समुदायच्या होत्या, असं वक्तव्य जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी केल्यानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. औरंगजेबचा नाश करण्यासाठी जैन महाराणी असलेल्या ताराराणींचा जन्म झाला असं वक्तव्य आचार्य नयन पद्मसागर यांनी केलं. मुंबईतील जैन समुदायाच्या एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यावरुन आता सामाजिक आणि राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान इतिहास तज्ज्ञ इंद्रजीत सावंत यांनी जैन मुनींच्या वक्तव्याचा चांगलाच समचार घेतला आहे.



