धर्मेंद्र यांची एक चूक अन् अमिताभ बच्चनच्या करिअरला मिळाला 'बूस्टर डोस'! नाहीतर बसला असता फ्लॉपचा शिक्का
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेते अमिताभ बच्चन आणि बॉलिवूडचे महानायक आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का एका सिनेमामुळे त्यांचं करिअर झालं. त्या सिनेमामुळे त्यांच्या करिअरला बुस्टर डोस मिळाला.
advertisement
advertisement
advertisement
'बन्सी बिरजू', 'एक नजर', 'संजोग' आणि 'रास्ते का पत्थर' यांसारखे चित्रपट एकापाठोपाठ एक फ्लॉप झाले. त्यांचा जड आवाज आणि उंच शरीरयष्टी या त्यांच्या कमकुवत बाजू मानल्या जात होत्या. अमिताभ यांनी आशा सोडून इंडस्ट्री सोडण्याचा विचार केला होता. त्याच वेळी, लेखक जोडी सलीम-जावेद यांनी एक अशी पटकथा तयार केली होती जी 'चॉकलेट हीरो' युगाच्या पूर्णपणे विरुद्ध होती. ते रागीट डोळ्यांच्या नायकाच्या शोधात होते. चित्रपटाचे नाव होते 'जंजीर'.
advertisement
दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांनी या चित्रपटासाठी सर्वप्रथम धर्मेंद्र यांच्याशी संपर्क साधला. जे तेव्हा 'सुलतान' म्हणून ओळखले जात होते. धर्मेंद्र यांना कथा आवडली आणि त्यांनी होकार दिला, पण त्यात एक ट्विस्ट होता. धर्मेंद्र 'लोफर' आणि 'यादों की बारात' यांसारख्या मोठ्या चित्रपटांमध्ये व्यस्त होते. प्रकाश मेहरा यांना चित्रपटाचे काम लगेच सुरू करायचे होते. पण धर्मेंद्र तारखा देऊ शकले नाहीत. अंतर्गत मतभेद आणि व्यस्त वेळापत्रकामुळे धर्मेंद्र यांनी हा प्रकल्प सोडण्याचा निर्णय घेतला. धर्मेंद्र यांच्या याच 'चुकी'मुळे भविष्यातील 'अँग्री यंग मॅन'चा मार्ग मोकळा झाला.
advertisement
धर्मेंद्र यांच्या नकारानंतर देव आनंद आणि राजकुमार यांसारख्या मोठ्या नावांनाही चित्रपटासाठी विचारणा करण्यात आली पण सर्वांनी नकार दिला. काहींना गाण्यांशिवाय पोलिसाची गंभीर भूमिका आवडली नाही तर काहींना त्यांच्या प्रतिमेची चिंता होती. अखेरीस सलीम आणि जावेद यांच्या आग्रहामुळे प्रकाश मेहरा यांनी अमिताभ बच्चन यांना संधी दिली.
advertisement
advertisement









