प्रितम पंडित, प्रतिनिधी: सोलापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यातील अक्कलकोट दक्षिण सोलापूर आणि मंगळवेढा तालुक्यात दमदार पाऊस झाला. जिल्ह्यातील अवकाळी पावसाचा रब्बी हंगामातील गहू आणि ज्वारी पिकाला धोका निर्माण झाला आहे. फळ उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे.



