पुणे : शहरात निर्माण झालेल्या एलपीजी सिलेंडर टंचाईचा फटका आता खाणावळ आणि छोट्या हॉटेल व्यवसायाला बसू लागला आहे. अनेक खाणावळींना पुरेशा प्रमाणात सिलेंडर उपलब्ध होत नसल्याने जेवण बनविणे कठीण झाले आहे. काही ठिकाणी हॅाटेल, मेस बंद पडल्याचे चित्र पाहिला मिळत आहेत. त्याचा थेट परिणाम उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि विविध अभ्यासक्रमांसाठी बाहेरगावाहून पुण्यात येऊन राहणाऱ्या विद्यार्थ्यांवर होण्याची शक्यता आहे.



