Ind Vs Pak: नागपूरच्या महिलेची थरारक कबुली; 10 दिवसांनी पाकिस्तानातून जिवंत परतली, काय घडलं नेमकं?
- Published by:Prachi Amale
Last Updated:
कारगिल मधील शेवटचे गाव 'हुंदरमान'मध्ये तिला पाहण्यात आले होते. त्यानंतर तिला कोणीच पाहिले नाही. बराच वेळ जेव्हा सुनीता परत आली नाही
नागपूर : नागपूर येथील 43 वर्षीय महिला 15 मे रोजी लडाखमधील कारगिल जिल्ह्यातील शेवटच्या गावातून रहस्यमय परिस्थितीत बेपत्ता झालेला महिलेचा अखेर शोध लागला आहे. महिला चुकून पाकिस्तानत गेली असून अखेर पाकिस्तान प्रशासनाने महिलेला भारतीय बीएसएफला सोपवलं आहे. मात्र प्राथमिक चौकशीमध्ये तिने सोशल मीडियाच्या अकाउंट वरून पाकिस्तानच्या व्यक्तीशी चॅटिंग केल्याचा समोर आलं. नेमकी चॅटिंग काय होती, त्यात आक्षेपार्ह आहे की नाही? या संदर्भातही पुढील तपास केला जाईल.
सुनीता ही नागपुरातून 4 मे रोजी बाहेर जात आहे असं सांगून घरून निघाली होती. त्यानंतर 11 मे रोजी कारगिल पोलिसांकडून माहिती मिळाली होती की, मुलाला सोडून ती पाकिस्तानला गेली होती. अमृतसर बीएसएफकडून महिलेला ताब्यात घेतल्यानंतर प्राथमिक चौकशी करण्यात आली. त्यानंतर नागपूर पोलिसांना सुद्धा माहिती देण्यात आली.. कपिल नगर पोलीस स्टेशनला माहिती मिळताच एक अधिकारी आणि दोन महिला पोलीस कर्मचारी हे अमृतसरला गेलेले आहे. अमृतसरला पोहचून कायदेशीर प्रक्रिया पार करतील .त्यानंतर सुनीता जामगडे महिलेला ताब्यात घेतील. पुढील चौकशी नागपूर पोलीस करतील अशी माहिती पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी दिली.
advertisement
महिलेची मानिसक स्थिती अस्थिर
कारगिल मधील शेवटचे गाव 'हुंदरमान'मध्ये तिला पाहण्यात आले होते. त्यानंतर तिला कोणीच पाहिले नाही. बराच वेळ जेव्हा सुनीता परत आली नाही. तेव्हा स्थानिकांनी 12 वर्षीय मुलाला स्थानिक पोलिसांच्या स्वाधीन केले. कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुनीता सुरुवातीला नर्स म्हणून काम करत होती. त्यानंतर ती कपडे शिवण्याचं काम करायची तिची मानसिक स्थिती अस्थिर असून तिच्या नागपूरतील रुग्णालयात उपचार सुद्धा सुरू होते. नागपुरातून निघताना ही तिने आपल्या कुटुंबीयांना अंधारात ठेवले होते. तर मुलाला कपडे घेऊन देते असं सांगून सुनीता घरातून बाहेर गेल्याची माहिती आहे,
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
May 26, 2025 9:59 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
Ind Vs Pak: नागपूरच्या महिलेची थरारक कबुली; 10 दिवसांनी पाकिस्तानातून जिवंत परतली, काय घडलं नेमकं?


