कृषी हवामान : शेतकऱ्यांवर मोठं संकट! जोरदार वाऱ्यासह पाऊस प्रचंड झोडपणार, 19 जिल्ह्यांना अलर्ट, उपाययोजना काय कराल?

Last Updated:

Maharashtra Weather Update : राज्यात पावसाचा जोर वाढू लागला असून हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी सतर्कतेचे इशारे दिले आहेत. माघारीस पोषक हवामान निर्माण झाल्याने दोन दिवसांत पश्चिम राजस्थानातून मॉन्सून परतीच्या प्रवासाला सुरुवात करेल, असा अंदाज आहे.

Maharashtra Weather Update
Maharashtra Weather Update
मुंबई : राज्यात पावसाचा जोर वाढू लागला असून हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी सतर्कतेचे इशारे दिले आहेत. माघारीस पोषक हवामान निर्माण झाल्याने दोन दिवसांत पश्चिम राजस्थानातून मॉन्सून परतीच्या प्रवासाला सुरुवात करेल, असा अंदाज आहे. मात्र, महाराष्ट्रात अजून काही काळ पावसाची सक्रियता कायम राहणार आहे.
हवामान स्थिती
बंगालच्या उपसागरात ओडिशा व आंध्र प्रदेश किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. चक्राकार वाऱ्यांमुळे ही प्रणाली १५ सप्टेंबरपर्यंत जमिनीवर येण्याची शक्यता आहे. गंगानगरपासून रोहतक, सोहनी, राजनंदगावपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून तो दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत पसरलेला आहे. वायव्य अरबी समुद्रात समुद्रसपाटीपासून सुमारे ५.८ किमी उंचीवर चक्राकार वारे सक्रिय आहेत.
advertisement
शनिवारी सकाळपर्यंत ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ३३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा जोर अधिक होता. परभणीतील पूर्णा येथे १६० मिमी तर पालम येथे ११० मिमी पाऊस नोंदविला गेला.
पावसाचा इशारा
आज, १४ सप्टेंबर रोजी रायगड जिल्ह्यात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. मुंबई, ठाणे, रत्नागिरी, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, सोलापूर, धाराशिव, लातूर, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा येथे जोरदार वादळी पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर नाशिक, अहमदनगर, जळगाव, पुणे, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे.
advertisement
कोणत्या फवारण्या कराव्यात?
सध्याच्या हवामानामुळे सोयाबीन, कापूस यांसारखी खरीप पिके परिपक्वतेच्या अवस्थेत आली आहेत. अचानक आलेल्या पावसामुळे बुरशीजन्य रोग व कीड वाढण्याचा धोका आहे. अशावेळी शेतकऱ्यांनी खालील फवारणी करणे आवश्यक आहे
सोयाबीन पिकासाठी : अळीच्या प्रादुर्भावावर नियंत्रणासाठी इमामेक्टिन बेन्झोएट ५% SG ५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. पाने पिवळसर होणे किंवा डाग पडणे टाळण्यासाठी कार्बेन्डाझिम ५०% WP २० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी वापरावे.
advertisement
कापूस पिकासाठी : गुलाबी बोंडअळी व तुडतुडे यांच्यावर नियंत्रणासाठी थायोमेथोक्साम २५% WG ४ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी किंवा स्पिनोसॅड ४५% SC २ मिली प्रति १० लिटर पाणी फवारणी करावी.
कांदा रोपवाटिका : रोपांची वाळवी, अळी किंवा डाऊनी मिल्ड्यू या रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मॅन्कोझेब ७५% WP २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी फवारणी करावी. तसेच, रोपांच्या मुळांजवळ पाणी साचू नये यासाठी निचरा व्यवस्थापन करावा.
मराठी बातम्या/कृषी/
कृषी हवामान : शेतकऱ्यांवर मोठं संकट! जोरदार वाऱ्यासह पाऊस प्रचंड झोडपणार, 19 जिल्ह्यांना अलर्ट, उपाययोजना काय कराल?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement