शेतकऱ्यांनो वारं फिरलं! 5 जिल्ह्यांत पाऊस धुमाकूळ घालणार, हवामान विभागाकडून अलर्ट
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Maharashtra Weather Update : मागील आठवडाभरात राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र, आता राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर ओसरलेला दिसतोय
मुंबई : मागील आठवडाभरात राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र, आता राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर ओसरलेला दिसतोय. काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानासह हलक्या सरींची शक्यता वर्तवली गेली आहे, तर काही भागांमध्ये हवामानात सुधारणा होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. यामुळे शेतकऱ्यांसाठी पुढील काही दिवस पीक व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहेत.
मुंबई आणि कोकणात हलका पाऊस
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मधूनमधून हलक्याफुलक्या सरी कोसळू शकतात. याचबरोबर ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांमध्येही ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा खंड
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या भागांमध्ये आकाश ढगाळ राहील, मात्र पावसात खंड पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागानुसार, याठिकाणी फारसा जोरदार पाऊस होण्याची शक्यता नाही.
advertisement
उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पावसाची विश्रांती
नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे. हवामान ढगाळ राहील, पण केवळ काही ठिकाणी हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांमध्येही पावसात कमी झाली आहे. स्थानीय वातावरणातील बदलांमुळे हलकासा पाऊस काही भागांमध्ये पडू शकतो.
advertisement
पूर्व विदर्भात यलो अलर्ट
नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मात्र हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. या भागांत हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून, काही ठिकाणी जोरदार सरींचाही अनुभव येऊ शकतो.
शेतकऱ्यांसाठी कृषी सल्ला
सध्याच्या हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पीक संरक्षणासाठी विशेष काळजी घ्यावी.
1) पावसाचा खंड पडत असल्यास, जमिनीत ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आंतरमशागत करावी.
advertisement
2) डोकं वर काढलेली भातखाचरे, सोयाबीन, मूग व उडीद यामध्ये कीड आणि रोग नियंत्रणासाठी फेरनस ट्रॅप, पिवळे चिकट सापळे वापरावेत.
3) मोकळे वातावरण असलेल्या भागांमध्ये अळ्यांचा प्रादुर्भाव वाढू शकतो; योग्य कीटकनाशकांचा सल्ल्यानुसार वापर करावा.
4) ज्या भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे, तिथे पाणी साचू न देता निचऱ्याची व्यवस्था करावी.
5) भात लावणी पूर्ण झालेल्या ठिकाणी, एकसंध वाढ सुनिश्चित करण्यासाठी थोडा टॉप ड्रेसिंग खतांचा वापर आवश्यक ठरतो.
advertisement
दरम्यान, राज्यभर हवामानात झालेला हा बदल शेतकऱ्यांसाठी संधी आणि आव्हान दोन्ही घेऊन येतो. योग्य नियोजन व उपाययोजना केल्यास नुकसान टाळता येईल आणि पिकांचे उत्पादनही सुरळीत राखता येईल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 02, 2025 9:15 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
शेतकऱ्यांनो वारं फिरलं! 5 जिल्ह्यांत पाऊस धुमाकूळ घालणार, हवामान विभागाकडून अलर्ट


