आईच्या नावावर असलेली मालमत्ता मृत्यूनंतर कोणाला मिळते? वारसदार कोण? वाचा नियम

Last Updated:

Property Rules : महिलांच्या नावावर असलेली मालमत्ता ही केवळ कौटुंबिक विषय नसून कायदेशीर दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची बाब आहे. पतीच्या पश्चात स्त्रीला वारसाहक्काने किंवा खरेदीद्वारे संपत्ती मिळू शकते.

Property Rules
Property Rules
मुंबई : महिलांच्या नावावर असलेली मालमत्ता ही केवळ कौटुंबिक विषय नसून कायदेशीर दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची बाब आहे. पतीच्या पश्चात स्त्रीला वारसाहक्काने किंवा खरेदीद्वारे संपत्ती मिळू शकते. मात्र, तिच्या मृत्यूनंतर ही मालमत्ता कोणाकडे जावी, याबाबत अनेकदा कुटुंबांत संभ्रम निर्माण होतो. कायद्यानुसार याबाबत स्पष्ट नियम ठरवलेले आहेत.
काय सांगतो हिंदू वारसा कायदा?
प्रचलित हिंदू वारसा कायदा १९५६ नुसार स्त्रीच्या मृत्यूनंतर तिच्या संपत्तीवर तिच्या कायदेशीर वारसांना समान हक्क असतो. या कायद्यानुसार, जर स्त्रीने मृत्युपत्र (Will) केले असेल, तर त्यानुसार मालमत्ता वाटप होते. मृत्युपत्र नसल्यास तिच्या सर्व कायदेशीर वारसांमध्ये संपत्ती समान वाटली जाते. मुलगा आणि मुलगी यांच्यात कोणताही भेदभाव केला जात नाही.
advertisement
वारस कोण असतात?
महिलेच्या मृत्यूनंतर तिचे पती, मुलगा आणि मुलगी हे प्राथमिक वारस ठरतात. जर हे वारस उपलब्ध नसतील तर तिच्या आई-वडिलांना हक्क मिळतो. पुढे भाऊ-बहीण यांनाही वारसाहक्क लागू शकतो. म्हणजेच महिलेच्या संपत्तीवर केवळ पुरुष नातेवाईकच नव्हे, तर स्त्री नातेवाईकांनाही तेवढाच अधिकार आहे.
कागदपत्रे का महत्त्वाची?
संपत्तीचे वाटप केवळ बोलून किंवा कौटुंबिक तडजोडीने ठरवता येत नाही. कायदेशीर कागदपत्र तयार करूनच वाटप वैध मानले जाते. अन्यथा त्याविरुद्ध न्यायालयात दाद मागता येऊ शकते. त्यामुळे वारसांमध्ये परस्पर समजूतदारपणा असला तरी, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक ठरते.
advertisement
विवाहित मुलींनाही हक्क
पूर्वी संपत्तीच्या वाटपात विवाहित मुलींना दुय्यम स्थान दिले जात असे. मात्र, कायद्यानुसार विवाहित मुलींनाही भावांप्रमाणेच समान हक्क दिला गेला आहे. यामुळे स्त्रीच्या संपत्तीवर तिच्या सर्व मुलांना विवाहित असो वा अविवाहित समान अधिकार मिळतो.
मृत्युपत्र असल्यास सोपी प्रक्रिया
जर महिलेने मृत्युपत्र केले असेल, तर मालमत्ता वाटपाची प्रक्रिया तुलनेने सोपी होते. मृत्युपत्रामध्ये ती कोणाला, किती हिस्सा द्यायचा हे स्पष्ट करू शकते. यामुळे वारसांमधील वाद टाळता येतो. मात्र, मृत्युपत्र कायदेशीर दृष्ट्या वैध असणे आवश्यक आहे.
advertisement
वारसांनी काय करावे?
महिलेच्या मृत्यूनंतर वारसांनी सर्व कायदेशीर वारसांची यादी तयार करावी.
महसूल विभागाकडे मालमत्ता वाटपाची नोंदणी करून घ्यावी.
गरज भासल्यास स्थानिक वकील किंवा महसूल अधिकाऱ्याचा सल्ला घ्यावा.
दरम्यान, महिलेच्या संपत्तीवर तिच्या मृत्यूनंतर सर्व वारसांना समान अधिकार आहे. भावनिक पातळीवर हा विषय नाजूक असला तरी, कायद्यानुसार स्पष्ट प्रक्रिया उपलब्ध आहे. योग्य कागदपत्रे व कायदेशीर वाटप केल्यास कुटुंबातील वाद टाळता येतात आणि संपत्तीचा हक्क प्रत्येक वारसाला समान मिळतो.
मराठी बातम्या/कृषी/
आईच्या नावावर असलेली मालमत्ता मृत्यूनंतर कोणाला मिळते? वारसदार कोण? वाचा नियम
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement