Krushi Market Rate: बाजारात शेतमालाचे दर पुन्हा घसरले, मका, सोयाबीन आणि कांद्याचे दर किती?

Last Updated:

शनिवार दिनांक 27 डिसेंबर रोजी राज्यातील कृषी बाजारात आज शेतमालाच्या दरात पुन्हा चढ उतार दिसून येत आहेत. मक्याच्या दरात घसरण नोंदवली गेली असून कांद्याचे दरही काहीसे कमी झाले आहेत.

+
Maharashtra

Maharashtra Krushi Market updates 

महाराष्ट्र: शनिवार दिनांक 27 डिसेंबर रोजी राज्यातील कृषी बाजारात आज शेतमालाच्या दरात पुन्हा चढ उतार दिसून येत आहेत. मक्याच्या दरात घसरण नोंदवली गेली असून कांद्याचे दरही काहीसे कमी झाले आहेत. मात्र, सोयाबीनच्या दरांमध्ये आज स्थिरता कायम राहिली आहे. पाहुयात, आज राज्याच्या कृषी मार्केटमध्ये सोयाबीन, मका आणि कांद्याला दर किती मिळाला?
मक्याच्या दरात घट: कृषी मार्केटमध्ये वेबसाईटवरील सायंकाळी 6.00 वाजताच्या रिपोर्टनुसार, राज्याच्या कृषीमार्केटमध्ये आज एकूण 18 हजार 199 क्विंटल मक्याची आवक झाली. यापैकी नाशिक मार्केटमध्ये 4 हजार 040 क्विंटल सर्वाधिक आवक झाली. त्यास प्रतीनुसार कमीत कमी 1458 ते जास्तीत जास्त 1843 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 3 क्विंटल मक्यास 2400 ते 2600 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला. मक्याला शुक्रवारी मिळालेल्या सर्वाधिक दरात आज घट झाली आहे.
advertisement
कांद्याचेही दर घसरले: राज्याच्या कृषीमार्केटमध्ये आज 1 लाख 26 हजार 811 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 43 हजार 450 क्विंटल सर्वाधिक आवक सोलापूर बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 100 ते 2900 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. सोलापूर मार्केटमध्ये आज कांद्याला सर्वाधिक बाजार भाव मिळाला. शुक्रवारी मिळालेल्या सर्वाधिक दराच्या तुलनेत आज कांद्याच्या दरात काहीशी घट दिसून येत आहे.
advertisement
सोयाबीनचे दर स्थिर: राज्याच्या कृषी मार्केटमध्ये आज 49 हजार, 296 क्विंटल सोयाबीनची एकूण आवक झाली. यापैकी लातूर मार्केटमध्ये 17 हजार 634 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 4132 ते 4947 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच जळगाव मार्केटमध्ये आवक झालेल्या 257 क्विंटल सोयाबीनला 5328 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला. सोयाबीनचे दर आज स्थिर आहेत.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Krushi Market Rate: बाजारात शेतमालाचे दर पुन्हा घसरले, मका, सोयाबीन आणि कांद्याचे दर किती?
Next Article
advertisement
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच, सुधारणा म्हणजे लोकांचे ओझे कमी करणे : पंतप्रधान मोदी
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच : पंतप्रधान मोदी
  • पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकार सामान्य नागरिकांचे जीवन सोपे करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

  • कर कायदे, श्रम संहिता, जीएसटी सुधारणा आणि उद्योगांसाठी नियम सुलभ करून प्रक्रिया सुलभ झाली.

  • मध्यमवर्गीयांना कर सवलत, एमएसएमईना कर्ज व सवलती, ग्रामीण रोजगारात टिकाऊ मालमत्ता निर्माण होत आहे.

View All
advertisement