Maharashtra Budget 2025 : शेतकऱ्यांसाठी सरकारच्या 7 प्रमुख घोषणा! वाचा सविस्तर
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Agriculture News : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधिमंडळात अर्थसंकल्प सादर करताना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.
मुंबई : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधिमंडळात अर्थसंकल्प सादर करताना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. त्यातील प्रमुख 7 घोषणा जाणून घेऊया..
1) नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प
21 जिल्ह्यांतील ७ हजार २०१ गावांमध्ये राबविण्यात येणार-त्यासाठी ३५१ कोटी 42 लाख रुपये नियतव्यय “कृत्रिम बुध्दिमत्ता” तंत्रज्ञानाचा शेतीक्षेत्रात वापर - पहिल्या टप्प्यात 50 हजार शेतकऱ्यांच्या एक लाख एकर क्षेत्राला फायदा - दोन वर्षात 500 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार. महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत कालवे वितरण प्रणालीतील सुधारणेची सुमारे 5 हजार 36 कोटी रुपये किमतीची कामे मंजूर
advertisement
2) जलयुक्त शिवार अभियान 2.0
या अंतर्गत ५ हजार ८१8 गावांमध्ये 4 हजार 227 कोटी रुपये किंमतीची एकूण १ लाख 48 हजार 888 कामे हाती घेणार,अभियानातील सर्व कामे मार्च, 2026 पर्यंत पूर्ण करणार “गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार” योजना कायमस्वरुपी राबवविणार
3) वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पास तत्वत मान्यता
advertisement
अंदाजित किंमत 88 हजार 574 कोटी रुपये -लाभक्षेत्र 3 लाख 71 हजार 277 हेक्टर नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाव्दारे नाशिक व जळगाव जिल्हयातील 49 हजार 516 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ-प्रकल्पाची अंदाजित किंमत 7 हजार 500 कोटी रूपये दमणगंगा -एकदरे -गोदावरी या 2 हजार 300 कोटी रूपये किंमतीच्या नदीजोड प्रकल्पामुळे 3.55 टीएमसी पाणी उपलब्ध होणार तापी महापुनर्भरण हा 19 हजार 300 कोटी रुपये किंमतीचा सिंचन-उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भातील खारपाण पट्ट्यातील शेतकऱ्यांना लाभ होणार. कोकणातील उल्हास आणि वैतरणा नद्यांच्या खोऱ्यातून 54.70 टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा प्रकल्प हाती घेण्यात येणार, मराठवाड्यातील सुमारे 2 लाख 40 हजार हेक्टर क्षेत्राच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार
advertisement
4) सांगली जिल्ह्यातील 200 मेगावॅट क्षमतेच्या म्हैसाळ उपसा सिंचन योजना
यामध्ये 1हजार 594 कोटी रुपये किंमतीच्या सौरऊर्जा प्रकल्पास मान्यता गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पातून डिसेंबर 2024 अखेर 12 हजार 332 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण, प्रकल्प जून, 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन
5) शेतकऱ्यांना मोफत वीज
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत 7.5 अश्वशक्ती पर्यंतच्या 45 लक्ष कृषी पंपांना मोफत वीज राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत 2 लाख 13 हजार 625 लाभार्थी शेतकऱ्यांना येत्या दोन वर्षांसाठी 255 कोटी रुपयांचा निधी
advertisement
6) बांबू आधारित उद्योगांना चालना देणार
बांबू आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी राज्यात ४ हजार ३०० कटी रुपये किमतीचा बांबू लागवड प्रकल्प राबविणार“आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष-2025” राज्यात विविध कार्यक्रम, महोत्सव आयोजित करण्यास पुरेसा निधी उपलब्ध देणार.2100 कोटी रुपये किंमतीचा मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन-स्मार्ट प्रकल्प राबवविणार
advertisement
7) महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस नेटवर्क-मॅग्नेट 2.0 उभारणार
राज्य शाश्वत व उच्च मूल्य असलेल्या कृषी व्यवसायाचे केंद्र व्हावे यासाठी “महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस नेटवर्क-मॅग्नेट 2.0” हा 2100 कोटी रुपयांचा प्रकल्प राबवविणार तसेच बी बियाणे, यंत्रसामुग्री, खते आणि शेतमालाच्या वाहतूकीसाठी “बळीराजा शेत व पाणंद रस्ते” ही नवी योजना सुरू करणार
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 10, 2025 3:42 PM IST









