advertisement

आधी फक्त १ लाख भांडवल, आता वर्षाला ६०० कोटींपर्यंत टर्नओवर! नाशिकच्या विलास शिंदेंनी कृषी क्षेत्रात कशी केली कमाल?

Last Updated:

Success Story : ‘इच्छा असेल तर मार्ग सापडतो’ ही म्हण अनेकदा ऐकायला मिळते. परंतु केवळ मार्ग सापडणे पुरेसे नसते, तर त्या मार्गावर परिस्थितीशी झगडत सातत्याने पुढे जात राहणे अधिक महत्त्वाचे असते.

success story
success story
नाशिक : ‘इच्छा असेल तर मार्ग सापडतो’ ही म्हण अनेकदा ऐकायला मिळते. परंतु केवळ मार्ग सापडणे पुरेसे नसते, तर त्या मार्गावर परिस्थितीशी झगडत सातत्याने पुढे जात राहणे अधिक महत्त्वाचे असते. अनेक अडचणींवर मात करत जो व्यक्ती आपल्या ध्येयावर ठाम राहतो, तोच शेवटी यशाच्या शिखरावर पोहोचतो. याचे जिवंत उदाहरण म्हणजे कृषी उद्योजक विलास शिंदे. प्रचंड संघर्ष, अपयश आणि कर्जाच्या डोंगरावर मात करत त्यांनी आज ‘सह्याद्री फार्म्स’सारखी यशस्वी शेतकरी उत्पादक कंपनी उभी केली आहे.
संघर्षातून उभा राहिलेला सह्याद्री फार्म्स
कृषी क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आणि सुवर्णपदक विजेते असलेले विलास शिंदे यांचे नाव आज देशभरात परिचित आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचे आणि त्यांच्या मालाला योग्य बाजारपेठ मिळवून देण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले. या उद्देशाने २०१० मध्ये त्यांनी केवळ एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून आणि १०० शेतकऱ्यांना सोबत घेत ‘सह्याद्री फार्म्स’ची स्थापना केली.
advertisement
सह्याद्री फार्म्स ही सहकारी संस्था आणि खाजगी मर्यादित कंपनीच्या मिश्र स्वरूपात चालणारी शेतकरी मालकीची संस्था आहे. नाशिकजवळील मोहाडी येथे या कंपनीचे मुख्य केंद्र असून सुमारे २५ हजार एकर क्षेत्रावर शेतकरी उत्पादन घेतात. या फार्मच्या माध्यमातून दररोज सुमारे एक हजार टन फळे आणि भाजीपाल्याचे उत्पादन बाजारात पाठवले जाते.
द्राक्ष निर्यातीमध्ये देशात आघाडी
सह्याद्री फार्म्स आज भारतातील द्राक्षांचा सर्वात मोठ्या निर्यातदारांपैकी एक म्हणून ओळखला जातो. २०१८-१९ या कालावधीत कंपनीने सुमारे २३ हजार मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात केली. याशिवाय १७ हजार मेट्रिक टन केळी आणि सुमारे ७०० मेट्रिक टन डाळिंबही परदेशात पाठवण्यात आले. कंपनीची वार्षिक उलाढाल सुमारे ५२५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
advertisement
विविध द्राक्ष वाणांची लागवड
सह्याद्री फार्म्सशी जोडलेले शेतकरी क्रिमसन, सोनाका, शरद सिडलेस, थॉमसन, फ्लेम आणि एआरआरए यांसारख्या द्राक्षांच्या विविध वाणांची लागवड करतात. कंपनीच्या उत्पादनापैकी सुमारे ६० टक्के फळे व भाजीपाला परदेशात निर्यात केला जातो, तर उर्वरित ४० टक्के उत्पादन देशांतर्गत बाजारात विकले जाते. रशिया, अमेरिका आणि युरोपसह ४२ देशांमध्ये सह्याद्री फार्म्सची उत्पादने पोहोचतात.
advertisement
मोहाडी येथे आधुनिक प्रक्रिया प्रकल्प
२०१८ मध्ये सह्याद्री फार्म्सने सुमारे २५० कोटी रुपयांची गुंतवणूक करून मोहाडी येथे १०० एकर परिसरात अत्याधुनिक फळ प्रक्रिया प्रकल्प उभारला. या कॅम्पसमध्ये ‘फार्मर हब’ही सुरू करण्यात आले आहे. या हबच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी उत्पादनासाठी लागणारे विविध इनपुट आणि तांत्रिक मार्गदर्शन दिले जाते. कंपनीकडून दर महिन्याला सुमारे ३८ हजार घरांपर्यंत फळे व भाजीपाला थेट पोहोचवला जातो. मुंबई, पुणे आणि नाशिक ही कंपनीची मोठी बाजारपेठ आहे.
advertisement
आज सह्याद्री फार्म्समध्ये सुमारे १२०० लोकांना रोजगार मिळाला आहे. तसेच या संस्थेशी जोडलेल्या शेतकऱ्यांच्या उत्पादनात सुमारे २५ टक्क्यांनी वाढ झाल्याचेही सांगितले जाते. घाऊक बाजारात जिथे द्राक्षांना सरासरी ३५ रुपये प्रति किलो दर मिळतो, तिथे सह्याद्री फार्म्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुमारे ६७ रुपये प्रति किलो दर मिळत असल्याचे विलास शिंदे सांगतात.
अपयशातून घेतलेले धडे
विलास शिंदे यांनी १९९८ मध्ये राहुरी कृषी विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून सुवर्णपदक मिळवले. त्यानंतर ते गावी परतले आणि द्राक्ष, टरबूज व मका यांसारखी पिके घेत शेती सुरू केली. मात्र या व्यवसायातून अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही.
advertisement
यानंतर त्यांनी दूध व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केला. बँक आणि खासगी सावकारांकडून कर्ज घेऊन त्यांनी २०० गायी खरेदी केल्या आणि लहानसे पाश्चरायझेशन युनिटही उभारले. त्याचबरोबर गांडूळ खत निर्मितीही सुरू केली. तरीही अपेक्षित यश मिळाले नाही आणि त्यांच्यावर सुमारे ७५ लाख रुपयांचे कर्ज झाले.
तरीही त्यांनी हार मानली नाही. २००४ मध्ये १२ शेतकऱ्यांना सोबत घेत त्यांनी स्वतःची कंपनी स्थापन केली आणि द्राक्ष निर्यातीचा मार्ग स्वीकारला. त्याच वर्षी ७२ मेट्रिक टन द्राक्षांची युरोपमध्ये निर्यात करण्यात त्यांनी यश मिळवले.
advertisement
थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा निर्णय
शेतीमाल विक्रीमध्ये मध्यस्थांवर अवलंबून राहण्याऐवजी थेट ग्राहकांपर्यंत उत्पादन पोहोचवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. याच विचारातून २०१० मध्ये सह्याद्री फार्म्सची स्थापना झाली. अनेक अडचणी, नुकसान आणि अपयशाचा सामना करत विलास शिंदे यांनी उभा केलेला हा उपक्रम आज शेकडो शेतकऱ्यांसाठी आर्थिक बळ देणारा ठरला आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
आधी फक्त १ लाख भांडवल, आता वर्षाला ६०० कोटींपर्यंत टर्नओवर! नाशिकच्या विलास शिंदेंनी कृषी क्षेत्रात कशी केली कमाल?
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement