मोदी सरकारचा नवीन वर्षांत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! १८४ पिकांच्या जाती केल्या विकसित
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
नवी दिल्ली : देशातील शेती अधिक सक्षम, टिकाऊ आणि नफेखोर करण्याच्या दिशेने केंद्र सरकारने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, उत्पादनक्षमता सुधारणे आणि बदलत्या हवामानाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी ४ जानेवारी २०२६ रोजी देशाला २५ पिकांच्या तब्बल १८४ नवीन व सुधारित जाती समर्पित केल्या जाणार आहेत. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते या जातींचे अधिकृत अनावरण होणार असून, हा कार्यक्रम नवी दिल्लीतील एनएएससी कॉम्प्लेक्समधील ए. पी. शिंदे सभागृहात पार पडणार आहे.
नवी दिल्ली : देशातील शेती अधिक सक्षम, टिकाऊ आणि नफेखोर करण्याच्या दिशेने केंद्र सरकारने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, उत्पादनक्षमता सुधारणे आणि बदलत्या हवामानाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी ४ जानेवारी २०२६ रोजी देशाला २५ पिकांच्या तब्बल १८४ नवीन व सुधारित जाती समर्पित केल्या जाणार आहेत. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते या जातींचे अधिकृत अनावरण होणार असून, हा कार्यक्रम नवी दिल्लीतील एनएएससी कॉम्प्लेक्समधील ए. पी. शिंदे सभागृहात पार पडणार आहे.
advertisement
निर्णय काय?
हवामान बदल, अनिश्चित पर्जन्यमान, वाढती लोकसंख्या आणि अन्नसुरक्षेची गरज या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना अधिक सक्षम बियाण्यांची आवश्यकता आहे. ही गरज ओळखून भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) शास्त्रज्ञांनी विविध कृषी-हवामान क्षेत्रांसाठी उपयुक्त अशा या नवीन जाती विकसित केल्या आहेत. या जाती केवळ उत्पादन वाढवणाऱ्या नसून रोगप्रतिबंधक, हवामान-सहनशील आणि संसाधनांचा योग्य वापर करणाऱ्या असल्याचे सांगितले जात आहे.
advertisement
या महत्त्वाच्या कार्यक्रमाला कृषी क्षेत्रातील २५० हून अधिक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे सचिव, DARE आणि ICAR चे महासंचालक, उपमहासंचालक, अतिरिक्त सचिव, सहाय्यक महासंचालक, मुख्यालय व विविध संशोधन संस्थांतील शास्त्रज्ञ तसेच DAFW आणि NSC चे वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित असतील. या मंचावर शेतकऱ्यांना थेट उपयोगी पडणाऱ्या संशोधनावर आणि भविष्यातील शेती धोरणांवर चर्चा होणार आहे.
advertisement
१८४ जाती विकसित
जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार, नव्या १८४ जातींपैकी मोठा वाटा धान्य पिकांचा आहे. यामध्ये एकूण १२२ जाती धान्य वर्गातील असून, त्यात तांदळाच्या ६० आणि मक्याच्या ५० जातींचा समावेश आहे. याशिवाय ज्वारी, बाजरी, राळा तसेच इतर किरकोळ भरड धान्यांच्या सुधारीत जाती देखील सादर केल्या जाणार आहेत. डाळींच्या बाबतीत तूर, मूग आणि उडीद यांच्या सहा नवीन जाती शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या जातील.
advertisement
तेलबिया पिकांमध्येही मोठी भर घालण्यात आली आहे. मोहरी, करडई, तीळ, भुईमूग, कोबी मोहरी आणि एरंडेल अशा महत्त्वाच्या पिकांच्या एकूण १३ नवीन जाती विकसित करण्यात आल्या आहेत. पशुपालनावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसाठी ११ चारा पिकांच्या जाती जाहीर केल्या जातील. तसेच ऊस उत्पादकांसाठी सहा नवीन उसाच्या जाती आणि कापसाच्या २४ जाती, त्यामध्ये २२ बीटी कापसाच्या जातींचा समावेश आहे. याशिवाय ताग आणि तंबाखूची प्रत्येकी एक नवीन जातही या कार्यक्रमात सादर केली जाणार आहे.
advertisement
या सर्व नवीन जाती शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरणार असल्याचा सरकारचा विश्वास आहे. अधिक उत्पादन, रोग व किडींचा प्रतिकार, सुधारित दर्जा आणि कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळवण्यास या जाती मदत करतील. या कार्यक्रमात प्रत्येक पिकाच्या जातींची वैशिष्ट्ये, लागवडीची पद्धत आणि संभाव्य लाभ यांची सविस्तर माहिती दिली जाणार असून, यामुळे देशातील शेती अधिक सक्षम होण्यास नक्कीच हातभार लागेल.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 04, 2026 8:13 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
मोदी सरकारचा नवीन वर्षांत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! १८४ पिकांच्या जाती केल्या विकसित











