हराळवाडी गावातील तरुण शेतकरी राहुल शेळके यांचे शिक्षण बी. फार्मसीपर्यंत झाले आहे. उच्चशिक्षित असूनही नोकरी मिळत नसल्याने त्यांनी गावाकडे शेती करायचा निर्णय घेतला. एका एकरात राहुल शेळके यांनी कांद्याची लागवड केली होती. एका एकरात कांद्याची लागवड केली होती. कांदा लागवडीसाठी राहुल शेळके यांना 80 ते 1 लाख रुपयांपर्यंत खर्च आला होता. परंतु या पावसामुळे कांद्याचे अतोनात नुकसान झाले असून तरुण शेतकरी राहुल शेळके यांचे जवळपास तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
advertisement
कांदा पिकाला कोणताही रोग पडू नये, कांदा खराब होऊ नये यासाठी राहुल शेळके यांनी पोटच्या मुलासारखं कांद्याला जपले होते. परंतु सोलापूर शहरात सुरू असलेल्या पावसामुळे कांद्याचे नुकसान झाले आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे संपूर्ण कांदा पीक हे जळून गेले आहे, तर आलेले कांदे हे पूर्णपणे खराब झाले आहेत. सरकारने लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी तरुण शेतकरी राहुल शेळके यांनी केली आहे.





