लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांची निवड होऊन शेतकऱ्यांना पंप खरेदी करावा लागेल. पंप खरेदी केल्यानंतर राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर 50 टक्के अनुदान जमा करण्यात येईल. या योजनेसाठी महाडीबीटीवर अर्ज करावा लागतो. अर्ज केल्यानंतर लॉटरी पद्धतीने निवड होऊन शेतकऱ्यांना मोबाईलवर संदेश जातो. सध्या बॅटरी संचलित स्प्रे पंप वापरण्यावर भर देण्यात येत आहे. त्यामुळे श्रम व वेळेत बचत होत आहे.
advertisement
पारंपरिक शेतीला रामराम, आता रेशीम शेती ठरली फायद्याची, बीडमधील तरुण झाला लखपती!
आवश्यक कागदपत्रे
या योजनेच्या लाभासाठी महाडीबीटीवर अर्ज करावा लागतो. सोबत सातबारा, आधारकार्ड, आधार लिंक बँक खात्याची माहिती, जात प्रमाणपत्र आदी कागदपत्रे लागतात. संबंधित शेतकरी महाराष्ट्रातील रहिवासी असावा. त्यांनी यापूर्वी स्प्रे पंप योजनेचा लाभ घेतलेला नसावा. जाती प्रवर्गातील शेतकरी असतील तर त्यांनी अर्ज करताना प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
गतवर्षी 12 हजार 320 शेतकऱ्यांना लाभ
गतवर्षी शासनाने जाहीर केलेल्या 100 टक्के अनुदान योजनेतून 12 हजार 320 जणांना लाभ देण्यात आला. यंदा 50 टक्के अनुदानावर स्प्रे पंप योजना सुरू आहे. त्यासाठी गरजू शेतकऱ्यांनी महाडीबीटीवर कागदपत्रांसह अर्ज करावा असा आवाहन जालन्याचे जिल्हा कृषी अधीक्षक गहिनीनाथ कापसे यांनी केला आहे.






