शेतीपूरक व्यवसाय हा नफा वाढवण्याचा पहिला आणि महत्त्वाचा प्रयोग मानला जात आहे. शेळीपालन, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, मधुमक्षिका पालन यांसारखे व्यवसाय शेतीसोबत केल्यास शेतकऱ्यांना नियमित आणि खात्रीशीर उत्पन्न मिळते. विशेषतः अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी हे व्यवसाय वरदान ठरत असून, कमी भांडवलात सुरू करता येत असल्याने जोखीमही कमी राहते.
Famous Misal Mumbai : मुंबईतील एकमेव ठिकाण, फक्त 25 रुपयांत 5 प्रकारची मिसळ, अशी चव चाखलीच नसेल
advertisement
दुसरा महत्त्वाचा प्रयोग म्हणजे कमी पाण्यात जास्त उत्पादन देणाऱ्या पिकांची लागवड. डाळी, तेलबिया, भाजीपाला तसेच कमी कालावधीत येणारी पिके घेतल्यास उत्पादन खर्च कमी होतो. तिसरा प्रयोग म्हणजे आंतरपीक पद्धत. एकाच शेतात दोन किंवा अधिक पिकांची लागवड केल्यास जमिनीचा आणि पाण्याचा योग्य वापर होतो, तसेच एखादे पीक फसले तरी दुसऱ्या पिकातून उत्पन्न मिळते.
चौथा प्रयोग म्हणजे सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती. रासायनिक खताऐवजी सेंद्रिय खतांचा वापर केल्यास उत्पादन खर्च कमी होतो आणि शेतमालाची गुणवत्ता वाढते. अशा शेतमालाला बाजारात जास्त दर मिळत असल्याने नफा वाढतो. सेंद्रिय शेतीकडे ग्राहकांचा वाढता कल हे याचे प्रमुख कारण आहे.
पाचवा आणि अत्यंत फायदेशीर प्रयोग म्हणजे थेट विक्री आणि ब्रँडिंग. शेतकऱ्यांनी स्वतःचा ब्रँड तयार करून भाजीपाला, धान्य किंवा प्रक्रिया केलेला शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविल्यास दलालांचा खर्च वाचतो. तसेच ठिबक सिंचन, मल्चिंग, माती परीक्षण आणि मोबाईल ॲप्सद्वारे बाजारभावाची माहिती घेतल्यास शेतीतील निर्णय अधिक अचूक होतात. योग्य प्रशिक्षण आणि बाजारपेठेची माहिती असल्यास हे पाच प्रयोग शेतकऱ्यांचे उत्पन्न लक्षणीयरीत्या वाढवू शकतात.





