TRENDING:

दिवाळीत जमीन खरेदी-विक्री करत आहात का? शासनाचा नवीन नियम काय आहे?

Last Updated:

Property Rules : राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी जमीन व्यवहारांना मोठी चालना देणारा निर्णय घेतला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी जमीन व्यवहारांना मोठी चालना देणारा निर्णय घेतला आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील भूखंड व्यवहारांना सुलभ करण्यासाठी "तुकडेबंदी अधिनियम" (Fragmentation Act) मध्ये ऐतिहासिक सुधारणा करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे हजारो छोट्या भूखंडधारकांना कायदेशीर मालकी हक्क मिळणार असून, दीर्घकाळ रखडलेले रजिस्ट्री आणि जमीन व्यवहार आता सोपे होणार आहेत.
property rules
property rules
advertisement

काय आहे तुकडेबंदी कायदा?

महाराष्ट्रात शेतीत अतिलहान तुकडे होऊ नयेत आणि शेती किफायतशीर राहावी, या उद्देशाने "तुकडेबंदी कायदा" लागू करण्यात आला होता. या कायद्यानुसार, जिरायती जमिनींचे २० गुंठ्यांपेक्षा कमी तुकडे आणि

बागायत जमिनींचे १० गुंठ्यांपेक्षा कमी तुकडे विक्री किंवा खरेदी करता येत नव्हते.

या मर्यादेमुळे अनेक नागरिकांना स्वतःच्या मालकी हक्काची नोंदणी, बांधकाम परवाना मिळवणे, आणि जमिनीचे व्यवहार पूर्ण करणे अवघड झाले होते. विशेषतः गावठाणालगत आणि उपनगरांमध्ये लहान भूखंड विक्रीसाठी हे अडथळे मोठे ठरत होते.

advertisement

शासनाचा नवीन नियम काय सांगतो?

राज्य सरकारने आता हा कायदा शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन नियमानुसार, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत आणि गावठाणालगत २०० ते ५०० मीटरपर्यंतचा परिसर या निर्णयाच्या कक्षेत येणार आहे. महापालिका क्षेत्रांच्या सीमेलगत दोन किलोमीटरपर्यंतचा भाग देखील विचारात घेतला जाणार आहे.

१ जानेवारी २०२५ पर्यंत अस्तित्वात असलेले एक गुंठ्यापर्यंतचे तुकडे आता कायदेशीररीत्या नियमित (legalized) करण्यात येतील. पूर्वी या नियमितीकरणासाठी जमिनीच्या बाजारमूल्याच्या २५ टक्के शुल्क आकारले जात होते. नंतर डिसेंबर २०२३ मध्ये ते ५ टक्क्यांवर कमी करण्यात आले होते. मात्र अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने सरकारने आता मोठा निर्णय घेतला आहे.

advertisement

नागरिकांना मिळणारे प्रमुख फायदे

या निर्णयामुळे राज्यातील सुमारे ५० लाख कुटुंबांना थेट फायदा होईल.

नागरिकांना आपल्या जमिनीचा कायदेशीर मालकी हक्क मिळेल.

जमिनीचे बांधकाम परवाने मिळविणे सुलभ होईल.

नियमित नोंदणीकृत मालमत्ता असल्याने बँकांकडून कर्ज मिळविणे सोपे होईल.

कुटुंबातील हिस्से आणि वारसाहक्काची नोंद अधिकृतरित्या करता येईल.

लहान भूखंड विक्री-विकत घेण्याचे व्यवहार कायदेशीर आणि सुलभ होतील.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आज नरक चतुर्दशी! व्यवसायात मिळणार संधी, धन लाभ होणार, तुमच्या राशीचे भविष्य काय?
सर्व पहा

मालकी हक्क मिळाल्याने मालमत्तेचे बाजारमूल्य वाढेल.

मराठी बातम्या/कृषी/
दिवाळीत जमीन खरेदी-विक्री करत आहात का? शासनाचा नवीन नियम काय आहे?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल