TRENDING:

Union Budget 2024 : शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग नेमका झाला तरी कुठे? जाणून घ्या तज्ज्ञांची मतं

Last Updated:

Agriculture News : किमान आधारभूत किमतीच्या कायदेशीर हमीची मागणी करत शेतकरी आंदोलन गेल्या एक वर्षापासून सुरू आहे. मात्र मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या पूर्ण अर्थसंकल्पात किमान आधारभूत किमतीचा उल्लेखही केलेला नाही. हमी देणे तर दूरची गोष्ट आहे. एवढेच नाही तर शेतकऱ्यांमध्ये सर्वात लोकप्रिय असलेल्या पीएम किसान सन्मान निधीची रक्कम वाढवण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : किमान आधारभूत किमतीच्या कायदेशीर हमीची मागणी करत शेतकरी आंदोलन गेल्या एक वर्षापासून सुरू आहे. मात्र मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या पूर्ण अर्थसंकल्पात किमान आधारभूत किमतीचा उल्लेखही केलेला नाही. हमी देणे तर दूरची गोष्ट आहे. एवढेच नाही तर शेतकऱ्यांमध्ये सर्वात लोकप्रिय असलेल्या पीएम किसान सन्मान निधीची रक्कम वाढवण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. असे म्हणत शेतकऱ्यांनी निराशा व्यक्त केली आहे.
News18
News18
advertisement

पीएम किसानचा हप्ता वाढला नाही

पीएम किसान योजनेअंतर्गत वर्षाला देण्यात येणाऱ्या 6000 रुपयांच्या रकमेची दुप्पट करण्याची मागणी बऱ्याच काळापासून करत आहेत. अशा परिस्थितीत, कृषी बजेटमध्ये वाढ होऊनही शेतकरी खूश नाहीत.

अभिमन्यू कोहाड हे  पंजाब-हरियाणाच्या शंभू सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनातील एक प्रमुख चेहरा आहे. त्यांनी 'किसान तक' या माध्यमाशी बोलताना सांगितले की, शेतकऱ्यांची सर्वात मोठी मागणी एमएसपी हमी आहे, परंतु सरकारने यावर काहीही सांगितलेले नाही. यावरून सरकारचा हेतू स्पष्ट होतो की ते एमएसपीच्या हमीवर पुढे जाऊ इच्छित नाही. सरकारने म्हटले आहे की ते तूर, उडीद आणि मसूरवर विशेष लक्ष देईल आणि सहा वर्षांत या पिकांमध्ये स्वयंपूर्ण होईल. त्याचप्रमाणे कापूस शेतीत उत्पादकता वाढवण्यासाठी 5 वर्षांचे अभियान जाहीर करण्यात आले आहे, परंतु हे सर्व कसे घडेल याचा कोणताही कृती आराखडा नाही हे आश्चर्यकारक आहे.

advertisement

खऱ्या मुद्द्यांवर चर्चाच नाही

कोहाड पुढे म्हणाले की, अर्थमंत्र्यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात विविधीकरणाचा उल्लेख केला आहे, परंतु त्यासाठी कोणताही कृती आराखडा नाही. केवळ विविधतेचा नारा देऊन चालणार नाही. यामुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानाची भरपाई करण्यासाठी शेतकऱ्यांना योजना असायला हवी, तरच विविधीकरण शक्य होईल. सर्व पिकांसाठी किमान आधारभूत किमतीची हमी मिळेपर्यंत पीक विविधीकरण होऊ शकत नाही हे आपले धोरणकर्ते का समजत नाहीत? असा सवाल कोहाड यांनी केला आहे.

advertisement

हमी भाव महत्वाचा का?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

सुप्रसिद्ध कृषी अर्थशास्त्रज्ञ देविंदर शर्मा म्हणाले की, अरुण जेटली यांनी 2014 मध्ये अर्थसंकल्प सादर केला तेव्हा त्यांनी सरकारच्या पाच प्राधान्यक्रमांचा उल्लेख केला होता. त्यात शेतकऱ्यांचे उत्पन्न सर्वाधिक होते. पण आज शेतकऱ्यांचे उत्पन्न सर्वात कमी आहे हे दुःखद आहे. सध्याच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात शेती ही विकासाचे इंजिन आहे असा उल्लेख केला होता. शेतीला इतके महत्त्वाचे मानल्याबद्दल त्यांचे कौतुक करायला हवे. पण सत्य हे आहे की जेव्हा शेतकऱ्यांचे उत्पन्न निश्चित असेल तेव्हाच कृषी क्षेत्र विकासाचे इंजिन बनेल. असं शर्मा म्हणाले आहेत.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
Union Budget 2024 : शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग नेमका झाला तरी कुठे? जाणून घ्या तज्ज्ञांची मतं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल