भागवतातील वर्णनाचा प्रत्यय - शरद उपाध्ये यांनी एक फेसबुक पोस्ट करून चिंता व्यक्त केली आहे. ते आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की, घोर कलियुग सुरू होऊन आता कुठे 5125 वर्षे झाली आहेत. अजून 4 लक्ष 26 हजार 875 वर्षे बाकी आहेत. कलियुगाच्या पहिल्याच चरणात मानवी क्रौर्याने सीमा ओलांडली आहे. माणसे क्रूर होतील, नास्तिक होतील, स्त्रियांशी गैरवर्तन करतील आणि लोक कर्तव्यच्युत होतील, हे भागवतातील भाकीत आज खरे ठरताना दिसत आहे.
advertisement
कोवळ्या जीवांवरील अत्याचाराने मन सुन्न - समाजात घडणाऱ्या गुन्ह्यांचा उल्लेख करताना ते म्हणतात की, 9 वर्षांपर्यंतच्या कोवळ्या मुलींवर होणारे अत्याचार आणि मानवी तस्करी हे महाक्रौर्य पाहून मन सुन्न होते. लहान मुलामुलींना पळवून नेऊन त्यांचा छळ करणे, त्यांना विजेचे झटके देणे आणि त्यांच्या किंचाळण्याचा पाशवी आनंद घेण्यासारख्या विकृत घटनांचे व्हिडिओ पाहून मानवतेचा थरकाप उडतो. ही सर्व कुकर्मे पुढे फेडावी लागणार आहेत याची पर्वा आता कोणालाच उरलेली नाही, असे त्यांनी नमूद केले.
श्रीहरीचे नामस्मरण हाच एकमेव आधार - कलियुगाच्या पहिल्या चरणात जर ही स्थिती असेल, तर पुढील तीन चरणांत काय भयावह परिस्थिती निर्माण होईल, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. या साऱ्या अनर्थापासून आणि नकारात्मकतेपासून वाचण्यासाठी श्रीहरीचे चरण घट्ट धरून चालणे, हाच सुरक्षित मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले.
नको तीच वार्ता कानी पडणार! तूळ, मिथुनसहित या राशींचे पुन्हा बॅडलक, अशुभ होळी
श्रीहरीचे नामस्मरणच आपल्याला सुखरूप ठेवील. भज गोविंदम, भज गोविंदम, असा मंत्र देत त्यांनी आपल्या मित्र-मैत्रिणींना सात्त्विक मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे. शरद उपाध्ये यांच्या या पोस्टवर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असून, अनेकांनी वाढत्या गुन्हेगारीवर आणि ढासळत्या मानवी मूल्यांवर चिंता व्यक्त केली आहे. माणूस म्हणून आपले वर्तन अधिक खराब होत आहे. नीतीमत्ता ठिकवणे ही काळाची गरज झाली आहे.
