आर्थिक राजधानी मुंबईतील गणेशोत्सव आणि अत्यंत सुंदर गणेश मूर्ती या जगात प्रसिद्ध आहेत. यावर्षी मुंबईतील माटुंगा येथील किंग्ज सर्कल येथील जीएसबी सेवा मंडळाचा गणपती पुन्हा एकदा चर्चेत आहे. या मंडळाला देशातील सर्वात श्रीमंत गणपती मंडळ म्हटले जाते. कारण येथील गणपती बाप्पाच्या मूर्तीला शेकडो किलो सोने आणि चांदीने सजवण्यात येतं. यामुळे या सेवा मंडळाने वर्ष 2025 च्या गणेशोत्सवासाठी मंडळाचा 450 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा विमा काढला आहे. याआधीही गणेशोत्सवादरम्यान या मंडळाचा कोट्यवधी रुपयांचा विमा काढण्यात आला होता, परंतु यावर्षी सर्व विक्रम मोडले गेल्याचे सांगण्यात येत आहे.
advertisement
70 कोटींहून अधिक किमतीचे दागिने -
मुंबईतील माटुंगा येथील जीएसबी सेवा मंडळाने बाप्पाला सुमारे 67 किलो सोन्याच्या दागिन्यांनी सजवलं आहे. तसेच, गणपती बाप्पा ज्या चांदीच्या सिंहासनावर विराजमान आहेत ते 350 किलो चांदीचे बनवलेले आहे. गणेश मंडळाने सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह केलेल्या विम्यात मंडळाचे स्वयंसेवक, पुजारी, स्वयंपाकी, सुरक्षा रक्षक इत्यादींचा अपघात विमा, सार्वजनिक दायित्व विमा तसेच कोणत्याही आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचा विमा यांचा समावेश आहे. हा विमा न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीनं केला आहे.
जीएसबी सेवा मंडळ पर्यावरणाची देखील काळजी घेतं -
जीएसबी सेवा मंडळ सध्या सर्वात श्रीमंत गणपती मंडळासाठी चर्चेत असलं तरी, हे मंडळ अनेक विशेष कामे करते. गौड सारस्वत ब्राह्मण समुदायासाठी या मंडळाचे विशेष महत्त्व आहे. या मंडळाची गणेश मूर्ती शाडू माती (पर्यावरणपूरक माती) पासून बनवली जाते, ती पर्यावरणपूरक आहे. तसेच, फक्त नैसर्गिक रंगांचा वापर केला जातो. रेकॉर्ड केलेले संगीत वाजवण्याऐवजी, पारंपारिक दक्षिण भारतीय मंदिरातील वाद्यांनी पूजा केली जाते.
गणपतीला दुर्वाच का वाहतात, तुळस का वाहत नाहीत? अशी आहे त्यामागची कथा
एक झलक करते इच्छा पूर्ण - असे मानले जाते की, माटुंग्याच्या या गणपतीची एक झलक भाविकांच्या इच्छा पूर्ण करते. 10 दिवसांच्या गणेशोत्सवादरम्यान दररोज सकाळी गणपतीची पूजा केल्यानंतर मंडपामध्ये नारळ फोडण्याची परंपरा आहे. फोडलेले नारळ भक्तांना प्रसाद म्हणून देण्याची परंपरा येथे आहे.