200 किमी पर्यंत मायलेज
प्रयागराज इथं राहणारे शैलेंद्र कुमार यांनी 18 वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर हे 6-स्ट्रोक इंजिन तयार केलं आहे. जर या इंजिनला जागतिक उद्योगात मान्यता मिळाली तर ते जागतिक ऑटो इंडस्ट्रीचा चेहराच बदलून जाईल. बाईकच्या सामान्य 4-स्ट्रोक इंजिनला 6 स्ट्रोकमध्ये बदलून, शैलेंद्र आता त्याच्या बाईकपासून 200 किमी पर्यंत मायलेज मिळवत आहेत.
advertisement
शैलेंद्र कुमार यांनी सांगितलं की, हे ६ स्ट्रोक इंजिन केवळ बाईकचे मायलेज सुधारत नाही तर बाईकची शक्ती आणि कार्यक्षमता तीन वेळा वाढवते. हे इंजिन पारंपारिक इंजिनच्या तुलनेत खूप पर्यावरणपूरक आहे. त्यातील धुराचे उत्सर्जन देखील खूप कमी आहे, ज्यामुळे प्रदूषण देखील मोठ्या प्रमाणात नियंत्रित केले जाऊ शकतं, असं शैलेंद्र कुमार यांचं म्हणणं आहे.
कोणतंही इंधन टाका बाईक चालणारच!
हे इंजिन कोणत्या इंधनावर चालणार असं तयार केलं आहे. पेट्रोल, डिझेल, CNG, इथेनॉल सारख्या कोणत्याही इंधनावर चालवता येईल. शैलेंद्र यांनी त्यांच्या जुन्या बाईकवर संशोधन करून हे इंजिन तयार केलं आहे. त्यांना या इंजिनचे पेटंट देखील मिळालं आहे.
इंजिनसाठी घरदार विकलं
शैलेंद्र यांनी हे इंजिन तयार करण्यासाठी त्यांच्या संपूर्ण आयुष्याची कमाई पणाला लावली आहे. त्यांनी त्यांची संपूर्ण मालमत्ता विकली. ज्यामध्ये त्यांचे वडिलोपार्जित घर देखील समावेश आहे. ते सध्या आर्थिक संकटातून जात आहेत. मुलांना शिक्षण देणे आणि त्यांचे पोट भरणे खूप कठीण आहे.
पंतप्रधान मोदींना आवाहन
शैलेंद्र कुमार हे मूळचे कानपूरचे आहेत. सध्या ते प्रयागराज इथं त्याच्या कुटुंबासह भाड्याच्या घरात राहत आहे. त्यांनी १९८३ मध्ये सीएमपी डिग्री कॉलेजमधून बी.एससी केलं आणि २००७ मध्ये टाटा मोटर्समध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर, त्यांनी आयआयटी-बीएचयूमध्ये इंजिनांबद्दल शिकलं. त्यांनी पंतप्रधान मोदींना या इंजिनचे व्यावसायिकीकरण करण्याचं आवाहन केलं आहे. त्याचा असा विश्वास आहे की, हे इंजिन देशाच्या आणि जगातील ऑटो उद्योगात मोठा बदल घडवून आणू शकतं.