TRENDING:

Insurance Claim : गाडी चोरीला गेली? पोलिसात तक्रारीला उशीर झाला तर विम्याचे पैसे मिळणार का?

Last Updated:

Insurance Claim : आयोगाने निर्णयात म्हटले आहे की, पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्यास विलंब झाल्याच्या आधारावर विमा कंपनी ग्राहकाचा विमा दावा नाकारू शकत नाही.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : वाहनाची चोरी झाल्यानंतर अनेकदा पोलिस तातडीनं चोरीची तक्रार दाखल करत नाहीत. मग अशा वेळी तक्रार दाखल करायला उशीर झाला, असं कारण पुढं करून विमा कंपन्या क्लेम रद्द करतात. अशा प्रकरणांच्या बाबतीत राष्ट्रीय ग्राहक आयोगानं खूप महत्त्वाचा निर्णय दिला आहे. महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातल्या बोरगाव काळे इथले शेतकरी भैरवनाथ साहेबराव यांच्या बाबतीतल्या प्रकरणात भैरवनाथ यांना दिलासा देण्यात आला आहे. टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स कंपनीकडून दाखल करण्यात आलेली याचिका रद्दबातल करून आयोगाने भैरवनाथ यांना दिलासा दिला आहे.
News18
News18
advertisement

आयोगाने दिलेल्या निर्णयात म्हटलं आहे, की पोलिसांकडून तक्रार दाखल करण्यास उशीर झाला, तरी विमा कंपनी कोणत्याही ग्राहकाच्या विम्याची देय रक्कम रद्द करू शकत नाही. परंतु, या विलंबासाठी वैध आणि वाजवी कारण दिलं गेलं पाहिजे.

वाचा - tata 54 वर्षांनंतर भारतात तयार करणार ही कार, किंमत 60 लाख इतकी होईल कमी!

advertisement

चोरीला गेलेल्या वाहनाच्या संदर्भातला विमा मिळवताना ग्राहकांना अनेकदा त्रास सहन करावा लागतो. मुळात, वाहनाची चोरी झाल्यास सगळ्यात आधी पोलिसात तक्रार दाखल करावी लागते; मात्र तक्रार दाखल करण्याच्या प्रक्रियेत विलंब होण्याचा अनुभव अनेकांना आला असेल. तक्रार दाखल करण्यापूर्वी अनेकदा ग्राहक आधी स्वतःच गाडीचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर तक्रार दाखल करतात. पोलिसात तक्रार दाखल होण्यासही विलंब होतो. त्यामागे अनेक कारणं असतात. वाहनाचा कोणत्या गैरकृत्यासाठी वापर करून त्यानंतर ते हरवलं असल्याची बतावणी केली जात आहे का, वाहन खरोखर चोरी झालं आहे का, वाहनाच्या विम्याचे पैसे मिळविण्यासाठी त्याच्या चोरीची खोटी तक्रार तर दाखल केली जात नाही ना, या बाबींचादेखील पोलीस तपास करून त्यानंतर तक्रार दाखल करत असतात. त्यामुळे काही वेळा वाहन चोरीला गेल्याची तक्रार प्रत्यक्षात दाखल करून घेण्यास पोलिसांकडून विलंब होतो. मात्र, या विलंबाचा फटका ग्राहकांना बसतो. पोलिसांत तक्रार दाखल करण्यास विलंब झाल्यामुळे विमा कंपनीनं विम्याच्या दाव्याचे पैसे देणं फेटाळण्याचा अनुभव काही ग्राहकांना येतो. महाराष्ट्रात लातूर जिल्ह्यातल्या प्रकरणात असाच अनुभव आल्यानंतर राष्ट्रीय ग्राहक आयोगानं याची गंभीर दखल घेतली आहे. आणि ग्राहकाच्या बाजूनं निकाल दिला आहे. तक्रार दाखल करण्यास विलंब होण्याचं उचित आणि वैध कारण दिलं गेलं असेल तर विमा कंपनीनं ग्राहकाला क्लेमचे पैसे दिले पाहिजेत, असंही त्यात म्हटलं आहे.

advertisement

मराठी बातम्या/ऑटो/
Insurance Claim : गाडी चोरीला गेली? पोलिसात तक्रारीला उशीर झाला तर विम्याचे पैसे मिळणार का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल