अनेकांना वाटतं की गाडी अजून जास्त चाललीच नाहीये, मग कशाला खर्च करायचा? तर काही जण किलोमीटरचा आकडा गाठण्याची वाट पाहत बसतात. पण कारची उत्तम कामगिरी (Performance), इंजिनचं आयुष्य आणि तुमची सुरक्षा यासाठी सर्व्हिसिंगची योग्य वेळ ओळखणं अत्यंत महत्त्वाचं आहे. चला तर मग, तुमच्या कारच्या आरोग्याचं नेमकं गणित काय आहे, ते सविस्तर समजून घेऊया.
advertisement
कार कंपन्यांचा 'गोल्डन रूल' काय सांगतो?मारुती सुझुकी, टाटा मोटर्स किंवा ह्युंदाई असो, बहुतांश दिग्गज कार उत्पादक कंपन्या एकच सल्ला देतात: 10,000 किलोमीटर किंवा 1 वर्ष यापैकी जे आधी पूर्ण होईल, तेव्हा कारची सर्व्हिसिंग करा.
हे गणित सोप्या भाषेत समजून घेऊ:जर तुमची कार जास्त धावत असेल: समजा, अवघ्या 8 महिन्यांतच तुमच्या कारने 10,000 किमीचा टप्पा पार केला, तर वर्ष पूर्ण होण्याची वाट पाहू नका; लगेच सर्व्हिसिंग करून घ्या.जर तुमची कार कमी धावत असेल: समजा, वर्ष पूर्ण झालंय पण गाडी फक्त 4,000 किमीच चालली आहे, तरीही सर्व्हिसिंग करणं अनिवार्य आहे.
गाडी कमी चालली असेल तरी सर्व्हिसिंग का गरजेची?बऱ्याच लोकांचा असा समज असतो की, "गाडी तर पार्किंगमध्ये उभी होती, मग सर्व्हिसिंग कशाला?" पण हे तांत्रिकदृष्ट्या चुकीचं आहे.1. इंजिन ऑईलची गुणवत्ता: इंजिन ऑईल ठराविक काळानंतर आपला चिकटपणा आणि गुणधर्म गमावू लागतं, मग गाडी चालो अथवा न चालो.2. फिल्टर्स आणि कूलंट: एअर फिल्टर, ब्रेक ऑईल आणि कूलंट यांसारख्या गोष्टी काळानुसार खराब होऊ शकतात.3. गंज आणि जाम होणे: दीर्घकाळ गाडी उभी राहिल्याने ब्रेकचे पार्ट्स किंवा बॅटरीमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे '1 वर्षाचा नियम' पाळणं तुमच्या कार इंजिनच्या आरोग्यासाठी हितकारक आहे.
सर्व्हिसिंगमध्ये नक्की काय काय तपासलं जातं?जेव्हा तुम्ही गाडी अधिकृत सर्व्हिस सेंटरला देता, तेव्हा खालील महत्त्वाच्या बाबींची तपासणी होते.इंजिन ऑईल बदलणे: जुनं ऑईल काढून नवीन ऑईल टाकलं जातं.फिल्टर चेक: ऑईल फिल्टर आणि एअर फिल्टरची स्वच्छता किंवा बदल.ब्रेक सिस्टीम: ब्रेक पॅड्स आणि ब्रेक ऑईलची कार्यक्षमता तपासणे.इलेक्ट्रॉनिक सिस्टीम: बॅटरीची स्थिती, इंडिकेटर्स, वायपर्स आणि सर्व लाइट्स.टायर आणि सस्पेन्शन: टायरमधील हवा, अलाइनमेंट आणि गाडीचे सस्पेन्शन स्मूद आहे की नाही याची खात्री.
वेळेवर सर्व्हिसिंग करण्याचे 'हे' आहेत फायदे1. चांगलं मायलेज: इंजिन ट्यूनिंग नीट असेल तर गाडी कमी इंधनात जास्त धावते.2. महागड्या दुरुस्तीपासून सुटका: छोट्या समस्या वेळीच सुटल्यामुळे पुढे जाऊन इंजिन निकामी होण्यासारखे मोठे खर्च वाचतात.3. सुरक्षित प्रवास: हायवेवर अचानक गाडी बंद पडण्याचा किंवा ब्रेक फेल होण्याचा धोका कमी होतो.
तुमची कार हे केवळ एक वाहन नसून तुमची गुंतवणूक आहे. 10,000 किमी किंवा 1 वर्ष या नियमाचे पालन केल्यास तुमची कार केवळ नव्यासारखी चकाकेलच नाही, तर रस्ते प्रवासात तुमची साथ कधीच सोडणार नाही.
