TRENDING:

All The Best! बारावीची परीक्षा आजपासून सुरू, कॉपी रोखण्यासाठी प्रशासन सज्ज!

Last Updated:

Maharashtra HSC Board Exam 2025: परीक्षेसाठी प्रशासनाकडून सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आलेली आहे. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी तब्बल 271 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : इयत्ता बारावीचे विद्यार्थी, त्यांचे पालक आणि प्राध्यापक ज्यासाठी वर्षभर कसून तयारी करत होते, अखेर तो क्षण आलेला आहे. आजपासून अर्थात 11 फेब्रुवारीपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा.
News18
News18
advertisement

विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी जाताना आपलं हॉल तिकीट अजिबात विसरू नये. महत्त्वाचं म्हणजे आता हॉल तिकिटासोबतच आपल्या महाविद्यालयाचं ओळखपत्र सोबत ठेवणंही अनिवार्य आहे. तसंच विद्यार्थ्यांनी परीक्षेला जाताना पाण्याची बाटली, पेन आणि इतर महत्त्वाचं साहित्य आवर्जून घ्यावं. दरम्यान, प्रशासनाकडून सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आलेली आहे. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी तब्बल 271 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

advertisement

11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 या कालावधीत बारावीची परीक्षा होणार आहे. यंदा परीक्षेसाठी एकूण 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामध्ये 8 लाख 10 हजार 348 मुलं आणि 6 लाख 94 हजार 652 मुलींचा समावेश आहे. राज्यातील 3 हजार 373 केंद्रांवर परीक्षा होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. प्रश्नपत्रिका फुटू नये म्हणून जीपीएसचं लाइव्ह ट्रॅकिंग होणार आहे. परीक्षा केंद्रावर व्हिडीओ चित्रीकरणही होणार आहे. संवेदनशील परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीची नजर असेल.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, कांदा आणि मक्याची काय स्थिती? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

दरम्यान, यंदा वाणिज्य शाखेचे सर्वाधिक 1 लाख 66 हजार 429 विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. त्याखालोखाल विज्ञान शाखेचे 1 लाख 27 हजार 704 विद्यार्थी आणि कला शाखेचे 47 हजार 879 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. मुंबईतून 1 लाख 26 हजार 630 विद्यार्थी परीक्षेला बसले असून ठाणे जिल्ह्यातून 1 लाख 15 हजार 484, रायगडमधून 35 हजार 987 आणि पालघर जिल्ह्यातून 63 हजार 220 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत.

advertisement

मराठी बातम्या/करिअर/
All The Best! बारावीची परीक्षा आजपासून सुरू, कॉपी रोखण्यासाठी प्रशासन सज्ज!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल