वरातीतील लोकांचं स्वागत करण्यासाठी लग्नात माशांचं जेवण करण्याचं नियोजन होतं. मात्र, कोण माशाचे जेवण करणार, यावरून वाद उफाळला. वादाचे रूपांतर लवकरच हाणामारीत झाले, ज्यामध्ये एका व्यक्तीच्या डोक्याला गंभीर इजा झाली.
या गोंधळात काही नशेत असलेल्या लोकांनी वर आणि वरातीतील लोकांवर हल्ला चढवला. गोंधळात वराने लग्नमंडपातून पळ काढला. त्याला शोधण्यासाठी लगबग सुरू झाली.
advertisement
गावात गोंधळ वाढल्यानंतर पथेरवा पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांनी वराचा शोध घेतला. मात्र, वर लग्नास तयार नव्हता. पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही पक्षांना समेट घडवून आणली. अखेर पहाटे पाच वाजता लग्नसोहळा पूर्ण करण्यात आला.
पथेरवा पोलीस स्टेशनचे अधिकारी दीपक कुमार सिंग यांनी सांगितले की, त्यांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. लग्नसोहळा शांततेत पार पडावा, यासाठी प्रयत्न करण्यात आले. पुढील कारवाईसाठी औपचारिक तक्रारीची प्रतीक्षा असल्याचे त्यांनी नमूद केले.
हे ही वाचा : अरे बाप रे! बनावट ईडी टीमने सोनाराचं घर अन् दुकान दोन्हीही लुटलं, 25 लाखांचा ऐवज चोरला, 12 जणांना अटक
हे ही वाचा : Solapur : लव्ह मॅरेज, वाद अन् हत्या! पतीला संपवलं अन् पत्नीने स्वत:च पोलिसांना कॉल करून सांगितलं