TRENDING:

271 कोटींच्या राजकीय निधीचा झोल, मुंबईच्या मोबाईलवर यायचा OTP, त्यानंतर... पक्षाची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'!

Last Updated:

राजकीय पक्ष बनवून तब्बल 271 कोटी रुपयांची हेराफेरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बोगस व्यवहारांच्या याप्रकरणी आयकर विभागाने मंगळवारी आरोपींच्या घरांवर छापे टाकले, यानंतर आता आणखी खळबळजनक माहिती समोर येत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : राजकीय पक्ष बनवून तब्बल 271 कोटी रुपयांची हेराफेरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बोगस व्यवहारांच्या याप्रकरणी आयकर विभागाने मंगळवारी आरोपींच्या घरांवर छापे टाकले, यानंतर आता आणखी खळबळजनक माहिती समोर येत आहे. या पक्षाने एकही निवडणूक लढलेली नाही, तसंच पक्षाचे तीन बडे अधिकारीही डमी असल्याचं तपासात समोर आलं आहे. आजही आयकर विभागाची टीम आरोपींच्या घराची तपासणी करत आहे.
271 कोटींच्या राजकीय निधीचा झोल, मुंबईच्या मोबाईलवर यायचा OTP, त्यानंतर... पक्षाची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'! (AI Image)
271 कोटींच्या राजकीय निधीचा झोल, मुंबईच्या मोबाईलवर यायचा OTP, त्यानंतर... पक्षाची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'! (AI Image)
advertisement

काय आहे संपूर्ण प्रकरण?

हे पूर्ण प्रकरण भीलवाडाचे वकील विकास व्यास (विजय सिंग पथिक नगर), दीपक जोशी (गुर्जर गली, आटूण) आणि त्याचा मित्र कमलेश आचार्य यांच्याशी जोडले गेले आहे. तीनही आरोपींनी 3 वर्षांपूर्वी नॅशनल सर्व समाज या नावाने राजकीय पक्षाची नोंदणी केली. तीनही आरोपी पक्षाच्या बँक खात्यात निधीची रक्कम घ्यायचे, त्यानंतर कमिशन कट करून रक्कम परत दिली जायची. काळा पैसा पांढरा करण्यासाठी हे सगळं सुरू होतं, असा दावा आयकर विभागाने केला आहे.

advertisement

आरोपी विकास व्यास हा पक्षाचा अध्यक्ष आहे. त्याच्या घरातून आयकर विभागाने अनेक कागदपत्र जप्त केली आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार नॅशनल सर्व समाज पार्टीने आतापर्यंत एकही निवडणूक लढलेली नाही. पक्षाच्या नोंदणीमध्ये विकास व्यास राष्ट्रीय अध्यक्ष, दीपक जोशी कोषाध्यक्ष आणि कमलेश आचार्य सचिव असल्याचं सांगण्यात आलं आहे. या तिघांनीच ही बनावट पदं बनवली होती.

advertisement

तीनही आरोपींच्या घरी जयपूर-अजमेरच्या टीम वेगवेगळ्या कारवाई करत आहेत. तसंच आरोपींचीही चौकशी केली जात आहे.

मुंबईच्या फोन नंबरवर यायचा OTP

समोर आलेल्या माहितीनुसार विकासने बँक अकाऊंटची केवायसी भीलवाडामधून केली होती. पण हे अकाऊंट मुंबईमधून दुसरी व्यक्ती ऑपरेट करत होती. बँकेमध्ये व्यवहार झाल्यानंतर ओटीपी मुंबईमधल्या व्यक्तीच्या मोबाईल नंबरवरच यायचा.

मागच्या 3 वर्षांमध्ये या अकाऊंटमधून तब्बल 271 कोटींचा व्यवहार झाला, त्यामुळे हे अकाऊंट आयकर विभागाच्या रडारवर आलं. दरम्यान याप्रकरणात वकील राहुल कोठारीही आयकर विभागाच्या रडारवर आला आहे, कारण त्यानेच पक्ष आणि विकास यांच्यात मध्यस्थी केली होती. बोगस क्लेममध्ये त्याचंही नाव आहे.

advertisement

गाझियाबादमध्ये पक्षाचं ऑफिस

मंगळवारी भीलवाडामध्ये कारवाई करण्याआधी आयकर विभागाच्या टीम गाझियाबादमध्ये पक्षाच्या नोंदणीकृत कार्यालयातही पोहोचल्या, पण तिथे पक्ष कार्यालयाला कुलूप होतं. यानंतर आयकर विभागाने भीलवाडामध्ये तीनही आरोपींच्या घरावर आणि कार्यालयावर छापे टाकले.

14 जुलैला पहिली कारवाई

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
त्वचेच्या विकरांवर गुणकारी, घरीच बनवा सोप्या पद्धतीने आयुर्वेदिक साबण, Video
सर्व पहा

14 जुलैला भीलवाडाच्या संजय कॉलनीमध्ये राहणाऱ्या अकाऊंटंट राजकुमारच्या घरी पहिले कारवाई झाली. राजकुमारला आयकर विभागाची टीम येत असल्याचा संशय आला आणि तो तिथून पळून गेला. अकाऊंटट राजकुमार अकाऊंट्स, इनकम टॅक्स रिर्टन आणि कर सल्लागार आहे.

advertisement

मराठी बातम्या/क्राइम/
271 कोटींच्या राजकीय निधीचा झोल, मुंबईच्या मोबाईलवर यायचा OTP, त्यानंतर... पक्षाची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'!
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल