श्रावणी राजेंद्र नरसुडे (वय 17 वर्षे 3 महिने) ही बार्शी येथे शिक्षण घेत होती. तिचे एका तरुणाशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याची कुणकुण वडील राजेंद्र लालासाहेब नरसुडे (वय 54) यांना लागली. रागावलेल्या राजेंद्र यांनी 27 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10:30 ते 12:30 च्या सुमारास घरातच श्रावणीचा तिच्याच ओढणीने गळा आवळून खून केला. हत्येनंतर पुरावे लपवण्यासाठी त्याने तिला बळजबरीने कीटकनाशक पाजले, मोबाईलमधील चॅट्स डिलीट केल्या आणि धाराशिव रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
advertisement
Solapur News: पत्नीला मेसेज केला, पतीचं डोकं फिरलं, मित्रावरच गोळीबार, सोलापूर हादरलं!
दरम्यान, सुरुवातीला वैराग पोलीस ठाण्यात 'अकस्मात मृत्यू'ची नोंद झाली. मात्र, पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदेश पवार यांच्या नेतृत्वात सखोल तपास सुरू झाला. शवविच्छेदन अहवालात गळा आवळल्याने श्रावणीचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
सायबर तज्ज्ञांनी डिलीट डेटा रिकव्हर करत संशय बळकट केला. पोलिसी खाक्या दाखवताच राजेंद्र याने गुन्हा कबूल केला. हवालदार संदेश पवार यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून, आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे वैराग परिसरात खळबळ उडाली असून अधिक तपास सुरू आहे.






