तिने एका कार्यक्रमात तिच्या आडनावाबद्दल आणि वडिलांविषयी भाष्य केलं आहे. कार्यक्रमामध्ये तब्बू म्हणाली की, "माझं बालपण अगदी व्यवस्थित गेलं, मी हैद्राबादमध्ये राहिलेय. लहान असतानाच माझ्या आई- वडिलांचा घटस्फोट झाला होता. त्यामुळे मी माझ्या बालपणी आईच्या आई- वडिलांकडेच राहिले. त्यामुळे आजी- आजोबांकडे खूप व्यवस्थित बालपण गेलं आणि माझी आई शिक्षिका होती. त्यामुळे सर्वात जास्त मी माझा वेळ त्यांच्यासोबतच घालवला. माझी आजी प्रार्थना करायची, पुस्तकं वाचायची, हे सर्व सततत कानावर पडूनच लहानाची मोठी झालीये. त्यांचा सहवास माझ्यासाठी फार महत्त्वाचा ठरला."
advertisement
मुलाखतीमध्ये पुढे तब्बू म्हणालीये की, " मी खूप लाजाळू होते. अभिनेत्री झाल्यानंतरही मी तशीच होते. या मुलाखतीमध्ये तबूने वडीलांबद्दलही भाष्य केलं आहे. तिच्या वडीलांचं आडनाव 'हाश्मी' होतं. त्यांचं आडनाव सुद्धा का नाही वापरलं, याबद्दलही तिने भाष्य केलंय. "मी केव्हाच माझ्या वडिलांच्या आडनावाचा वापर केला नाही. कारण, मला ते केव्हाच वापरणं महत्त्वाचं वाटलं नाही. माझं पूर्ण नाव तबस्सुम फातिमा असं होतं. शाळेत ‘फातिमा’ हेच माझं आडनाव म्हणून वापरत होते.", असं तबू मुलाखती दरम्यान म्हणालीये.
वडिलांपासून असलेल्या भावनिक अंतराबद्दल तबू म्हणाली की, "माझ्याकडे वडिलांच्या कोणत्याही आठवणी नाहीत. माझी बहीण त्यांना केव्हातरी भेटली आहे, पण मला केव्हाच त्यांना भेटावंसं वाटलं नाही. मला त्यांच्याबद्दल कोणत्या गोष्टी जाणून घेण्याचीही इच्छा नाही. मी जशी मोठी झाले, ज्या ज्या गोष्टी मला आयुष्यात मिळाल्या आहेत. त्यात मी समाधानी आहे." तबू तीन वर्षांची असताना तिच्या आई- वडिलांचा घटस्फोट झाला. त्यानंतर तबू आणि तिची आई आजी- आजोबांकडे शिफ्ट झाले आणि तिच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं.
दरम्यान, तब्बूचं खरं नाव तबस्सुम फातिमा आहे. देव आनंद यांनी तिला तब्बू हे नाव दिले. देव आनंद एका वाढदिवसाच्या पार्टीत तब्बूला भेटले होते, तेव्हा तिला त्याच्या 'हम नौजवान' चित्रपटात कास्ट केले होते. या चित्रपटात तब्बूने देव आनंदच्या मुलीची भूमिका साकारली होती. चित्रपटात तिला तब्बू म्हणून श्रेय देण्यात आले. खरंतर, तब्बूने 11 व्या वर्षीच 'बाजार' चित्रपटातून छोटीशी भूमिका साकारत अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले. त्यानंतर तिने 'काला पानी', 'इरुवर', 'द नेमसेक', 'हैदर', 'मकबूल', 'जीत' यांसारख्या चित्रपटातील तिच्या धाडसी भूमिकांमुळे प्रसिद्ध झाली. तिला 'माचिस' आणि 'चांदनी बार' या चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला.
