खंडाळा मेन्शनमधील हे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. जावेद अख्तर हे फराह खानचे काका आहेत. जावेद अख्तर यांचं पहिल्यांदा फराहची मावशी हनी इराणी यांच्यासोबत लग्न झालं होतं. जावेद आणि हनी इराणी यांना झोया अख्तर आणि फरहान अख्तर अशी दोन मुले आहेत. त्यानंतर, हनी इराणी आणि जावेद अख्तर यांचा घटस्फोट झाला. हनीपासून विभक्त झाल्यानंतर जावेद यांनी अभिनेत्री शबाना आझमी यांच्यासोबत लग्न केलं.
advertisement
जावेद अख्तर यांनी फराहच्या युट्यूब ब्लॉगमध्ये त्यांच्या खंडाळ्यातील बंगल्याविषयीची माहिती दिली, शिवाय त्यांच्या संघर्षाच्या दिवसांबद्दलही सांगितलं. व्हिडिओमध्ये शबाना यांनी खुलासा केला की, "त्यांनी (शबाना) ही संपत्ती 15 वर्षांपूर्वी खरेदी केली होती. पुढे शबाना म्हणाल्या की, "मला जेव्हा या आलिशान बंगल्याबद्दल कळलं तेव्हा मला या बंगल्याला वीकेंड कॉटेजमध्ये बदलायचं होतं. त्यामुळे या मुद्द्यावरून आम्ही दररोज भांडायचो." मग जावेद यांचा एक मित्र म्हणाला की, 'जावेद अख्तर म्हणजे शोले आणि तू म्हणजे अंकुर. या दोघांचं कधीही एकमत होऊ शकत नाही. त्यामुळे तू अंकुरला सोडून शोले बनव'
स्ट्रगलच्या दिवसांबद्दल बोलताना जावेद अख्तर म्हणाले की, "कधीकधी मला वाटतं की, हे माझ्यासोबत घडत आहे का? ज्यांच्या आयुष्यात काहीही नाही ते किती मस्त आयुष्य जगू शकतात. मी तीन दिवस जेवलो नाही म्हणून उपासमारीवर एक कविता लिहिली होती. तुम्ही मोठ्या घरात राहू शकता, पण तुमच्या आयुष्यात एक छोटी खोली आहे जी नेहमीच तुमच्यासोबत असते. मी त्यावेळी फूटपाथवरही झोपलो आहे."
