TRENDING:

Abhijeet Sawant : इंडियन आइडल जिंकल्यानंतर लोकांनी डोक्यावर घेतलं; पण इंडस्ट्रीत नाही मिळाली गाण्याची संधी, कारण होत धक्कादायक

Last Updated:

इंडियन आयडिअल जिंकल्यानंतर अभिजीतचा पहिला म्युझिक अल्बम आला. 'आप का अभिजीत' असं त्या अल्बमचं नाव होतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, 07 ऑक्टोबर :  ‘मोहब्बतें लुटाऊंगा…’ हे गाणं ऐकल्यानंतर डोळ्यांसमोर एक चेहरा येतो तो म्हणजे या गाण्याचा गायक मराठमोळा अभिजीत सावंत. इंडियन आयडल या स्पर्धेच्या पहिल्या पर्वाचा विजेता ठरलेला अभिजीत सावंत आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. एका काळ होता जेव्हा अभिजीतची एक झलक पाहण्यासाठी चाहते गर्दी करायचे. अभिजीत यशाच्या शिखरावर पोहोचला होता. त्याच्या आवाजाचे लाखो लोक दिवाने झाले होते. पण जितक्या लवकर अभिजीतला प्रसिद्धी मिळाली तितक्यात जोरात तो प्रसिद्धीच्या शिखरावरून खाली देखील आला. उत्तम आवाज असूनही अभिजीतला बॉलिवूडमध्ये गाणी मिळाली नाही. अभिजीतच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या करिअरवर एक प्रकाशझोप टाकूया.
अभिजीत सावंत
अभिजीत सावंत
advertisement

अभिजीत सावंतचा जन्म 7 ऑक्टोबर 1981 साली झाली. तो मुळचा मुंबईचा. अभिजीतला सुरूवातीपासूनच गाण्याची आवड होती. इंडियन आयडिअलपासून त्यानं सुरूवात केली. अभिजीतनं या कार्यक्रमात पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांची मनं जिंकली. प्रेक्षकांनी अभिजीतला वोट देत त्याला पहिला इंडियन आयडिअल बनवलं,

हेही वाचा -  50 किलो वजन कमी केल्यानंतर अशी दिसतेय अभिनेत्री आरती सोळंकी; वेट लॉससाठी दररोज करायची 'या' गोष्टी

advertisement

इंडियन आयडिअल जिंकल्यानंतर अभिजीतचा पहिला म्युझिक अल्बम आला. 'आप का अभिजीत' असं त्या अल्बमचं नाव होतं. या अल्मबमधील ‘मोहब्बतें लुटाऊंगा मैं छेड़कर मन का साज…’ हे गाणं खूप लोकप्रिय झालं. या गाण्यानं प्रेक्षकांमध्ये अभिजीतची क्रेझ निर्माण झाली. त्यानंतर यशाच्या शिखरावर असलेल्या अभिजीतनं 'आशिक बनाया आपने’सिनेमातील ‘मरजावां’ हे गाणं गायलं.

बॉलिवूड स्पायला दिलेल्या एका मुलाखतीत अभिजीतनं त्याचं करिअर आणि इंडस्ट्रीचं सत्य सांगितलं होतं. सिनेमातील गाण्याची संधी न मिळण्यामागचं खरं कारण त्यानं सांगितलं होतं. तो म्हणाला, "आपली इंडस्ट्री टॅलेंटवर कमी आणि ओळखींवर जास्त काम करते. बहुतांश संगीतकार आपल्या ओळखीच्या गायकांनाच संधी देतात. त्यांचा एक गट असतो अन् त्या गटामध्ये पोहोचणं बाहेरील गायकांसाठी खुप कठीण असतं. माझ्या बाबतीतही तेच घडलं".

advertisement

अभिजीत पुढे म्हणाला, "इंडियन आयडल जिंकल्यावर माझा प्रवास सुरु झाला. गेल्या 15 वर्षांच्या काळात अनेकांनी मला रिजेक्ट केलं. कारण मी त्यांच्या गटातील गायक नव्हतो. रिअलिटी शोमधील कलाकार रातोरात प्रसिद्ध होतात, त्यांचा खुप मोठा फॅन फॉलोअर्स असतो. मात्र त्यांच्यासोबत काम करायला इंडस्ट्रीमधील कलाकार कंफर्टेबल नसतात. त्यामुळं त्यांना म्हणावी तशी संधी मिळत नाही".

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Abhijeet Sawant : इंडियन आइडल जिंकल्यानंतर लोकांनी डोक्यावर घेतलं; पण इंडस्ट्रीत नाही मिळाली गाण्याची संधी, कारण होत धक्कादायक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल