टूर्नामेंटदरम्यान माजी पाकिस्तानी खेळाडू शोएब अख्तर एका चर्चेत होता. तो पाकिस्तानच्या प्लॅनिंगबद्दल बोलत होता आणि अभिषेक शर्माचे नाव घ्यायचे असताना चुकून त्याने "अभिषेक बच्चन" असं म्हटलं. त्याच वेळी ही चूक चाहत्यांच्या नजरेतून सुटली नाही. सोशल मीडियावर याची जोरदार खिल्ली उडाली.
एकमेकांना मिठी मारुन रडल्या काजोल-राणी मुखर्जी, दुर्गापूजेदरम्यान नेमकं काय घडलं?
advertisement
भारताने अंतिम सामन्यात पाच विकेट्सनी पाकिस्तानला हरवले. त्यानंतर बिग बींनी X (ट्विटर) वर एक भन्नाट पोस्ट टाकली. त्यांनी लिहिलं, "तू जिंकलास!! छान खेळलास 'अभिषेक बच्चन'... तिथे जीभ अडखळली झाली, आणि इथे बॅटिंग, बॉलिग, फिल्डिंग न करता शत्रूला अडखळवलं ते बोलती बंद! जय हिंद! जय भारत! जय माँ दुर्गा."
या पोस्टमध्ये अमिताभ बच्चन यांनी थेट शोएब अख्तरचा उल्लेख केला नसला तरी संदेश सगळ्यांना समजला. चाहत्यांनी लगेचच "ही खरी जखमेवर मीठ चोळणारी स्टाईल आहे" असं म्हणत बिग बींच्या विनोदाची वाहवा केली. अमिताभ यांची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेचा विषय ठरत आहे.