एका मीडिया पोर्टलशी बोलताना फरहाना भट्टने खामेनेई यांच्या मृत्यूबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं. ती म्हणाली, "खामेनेई हे असं व्यक्तिमत्व होतं ज्यांना कधीच विसरता येणार नाही. ते अनेकांसाठी मसीहा होते आणि ते नेहमीच आमच्या हृदयात जिवंत राहतील. अल्लाह त्यांची शहादत कबूल करो. काश्मीरी लोकांची मनं या बातमीने होरपळून निघाली आहेत. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण सेहरीनंतर मी अजिबात झोपू शकले नाही. नमाज पडताना मला खूप रडू आलं, कारण असं व्हायला नको होतं."
advertisement
फरहानाच्या वक्तव्यानंतर टीकेची झोड
खामेनेई यांच्याबद्दल पुळका दाखवणं फरहानाला चांगलंच महागात पडलं आहे. इराणमध्ये महिलांवर होणारे अत्याचार आणि मानवाधिकारांच्या उल्लंघनाचा दाखला देत नेटकऱ्यांनी तिला धारेवर धरलं आहे.
एका युजरने कमेंट केली की, "फरहाना, कृपया पूर्ण सत्य जाणून घेतल्याशिवाय अशा गंभीर विषयावर बोलू नका. अनेक निष्पाप मुलींवर तिथे अत्याचार झाले, त्यांचा आवाज दाबला गेला. हा धर्माचा नाही, तर मानवतेचा प्रश्न आहे." दुसऱ्या एका युजरने संताप व्यक्त करत लिहिलं, "आपल्या देशात प्रत्येक प्रकारचे अडाणी लोक भरलेले आहेत, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं."
इराणमधील परिस्थिचे भारतात पडसाद
खामेनेई यांच्या मृत्यूनंतर भारतातही संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही ठिकाणी लोक शोक व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरले, तर बॉलिवूडमधील काही कलाकारांनी हा 'हुकूमशाहीचा अंत' असल्याचं म्हणत आनंद व्यक्त केला आहे. फरहाना भट्टने भावनिक होऊन केलेल्या विधानामुळे ती आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अनेकांनी तिला इतिहासाचा अभ्यास करण्याचा सल्लाही दिला आहे.
