राजेश खन्ना–अंजू महेंद्रू यांचा ब्रेकअप का झाला?
राजेश खन्ना आणि अंजू महेंद्रू यांची प्रेमकहाणी 1960 च्या दशकाच्या अखेरीस 'बंधन' (1969) या चित्रपटापासून सुरू झाली, जेव्हा ते पहिल्यांदा एकत्र ऑनस्क्रीन दिसले. जसजसं राजेश खन्नांचं सुपरस्टारडम वाढत गेलं, तसतसं त्यांच्या नात्यात तणाव निर्माण होऊ लागला. अंजू, ज्या कधी ग्रेस आणि एलिगन्सचं प्रतीक मानल्या जात होत्या, त्यांना हळूहळू साइडलाईन केलं जात असल्याची भावना येऊ लागली. सुपरस्टारच्या झपाट्याने वाढणाऱ्या लोकप्रियतेपुढे त्यांचं करिअर फिकं पडलं. राजेश खन्नांच्या पझेसिव्ह स्वभावाबद्दल आणि पारंपरिक विचारसरणीबद्दल अफवा पसरल्या. अशीही चर्चा होती की त्यांना अंजूचे मॉडर्न कपडे आणि अभिनय आवडत नव्हते. अखेर त्यांचं नातं तुटलं आणि 1973 मध्ये राजेश खन्नांनी 15 वर्षांच्या नवख्या अभिनेत्री डिंपल कपाडियाशी लग्न केलं.
advertisement
ब्रेकअपनंतर अभिनेत्रीची अवस्था
राजेश खन्नांपासून वेगळं झाल्यानंतर अंजू लाइमलाइटपासून दूर गेल्या आणि या वादाचा त्यांच्या करिअरवरही परिणाम झाला. अनेक वर्षांनंतर त्यांनी आपल्या नात्याबद्दल विचार करताना कबूल केलं की आपल्या नासमजुतीमुळे त्यांनी राजेश खन्नांचा लग्नाचा प्रस्ताव नाकारला आणि नंतर त्याचा त्यांना पश्चात्ताप झाला. त्यानंतर त्या 1972 ते 1979 दरम्यान इम्तियाज खानसोबत रिलेशनशिपमध्ये होत्या. सध्या त्या एकट्याच आयुष्य जगत आहेत.
रुपेरी पडद्यासह TV विश्व गाजवणारी अभिनेत्री
अंजू महेंद्रू यांनी चित्रपटांसोबतच टेलिव्हिजन क्षेत्रातही काम केलं आहे. ‘कहीं तो होगा’, ‘कसौटी जिंदगी की’ आणि ‘एक हजारों में मेरी बहना है’ यांसारख्या मालिकांमध्ये त्यांनी लक्षात राहणाऱ्या भूमिका साकारल्या. आजही त्या टेलिव्हिजन आणि वेब सीरिजच्या दुनियेत सक्रिय आहेत.
