राजपाल यादव म्हणाला, "मला जनरलशी बोलायचे आहे. मी 30 वर्षांपासून बॉलिवूडमध्ये आहे. देशातील आणि जगातील प्रत्येक मूल माझ्यासोबत आहे म्हणूनच मी 200.250 चित्रपट करू शकलो. ही कहाणी 2012-13 मध्ये सुरू झाली. 2026 पर्यंत मी 250 चित्रपट केले असतील. भारतीय चित्रपटसृष्टीतील मुले, वृद्ध आणि तरुण हे माझ्या काळजाचा तुकडा आहेत. ते माझ्यासोबत होते ते माझ्यासोबत आहेत. गेल्या 10 वर्षात माननीय उच्च न्यायालयाने जिथे जिथे आदेश दिले आहेत तिथे मी हजर राहिलो आहे. भविष्यात जिथे जिथे आपल्याला आदेश मिळतील तिथे मी हजर राहीन. बालपणापासून ते 55 वर्षांपर्यंत मला वाटते की 1.5 अब्ज लोक आहेत आणि आमचे मनोरंजन हे त्यांच्याशी रक्ताचे नाते आहे."
advertisement
1.5 कोटी रुपये जमा केल्यानंतर जामीन मंजूर राजपाल यादव यांनी सोशल मीडियावर मिळालेल्या प्रचंड पाठिंब्याबद्दल चाहत्यांचे आभार मानले. वृत्तानुसार, थकबाकीच्या रकमेपैकी 1.5 कोटी रुपये जमा केल्यानंतर राजपाल यादवची जेलमधून सुटका झाली. अभिनेत्याने लवकरच एक मोठी पत्रकार परिषद घेणार असल्याचं सांगितलं आहे. यात तो संपूर्ण वादावर आणि त्यांच्या तुरुंगातील अनुभवांवर उघडपणे चर्चा करतील. राजपाल यांनी कधीही त्यांच्या जबाबदाऱ्यांपासून दूर गेले नाहीत आणि न्यायालयाच्या प्रत्येक आदेशाचे पालन करण्यास तयार आहेत, असं त्याच्या वकिलांनी सांगितलं.
बॉलिवूडचा पाठिंबा
या कठीण काळात राजपाल यादव एकटा नव्हता संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्री त्याच्या पाठिशी उभी होती. सलमान खान, अजय देवगण, सोनू सूद आणि वरुण धवन यांसारख्या दिग्गज कलाकारांनी, मिका सिंग आणि गुरु रंधावा यांच्यासह, मदतीचा हात पुढे केल्याचे वृत्त आहे.
हा संपूर्ण वाद 2010 पासून सुरू आहे. राजपाल यादवने अता पता लापता या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. हा सिनेमा फ्लॉप झाला आणि मनी लाँड्रिंगचा खटला न्यायालयात पोहोचला. सुमारे 9 कोटी रुपयांच्या या थकबाकी प्रकरणात त्याला सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. पण इंडस्ट्रीच्या पाठिंब्यामुळे आणि कायदेशीर कारवाईमुळे राजपालला नवीन सुरुवातीची आशा आहे.
