50 वर्षांपूर्वीच्या मित्राशी फोनवर संवाद
या व्हायरल व्हिडीओमध्ये सयाजी शिंदे आपल्या सातवीतील मित्राशी बोलताना दिसतात. त्यांना कोलकात्यात पंजाबी चित्रपटाच्या शूटिंगसाठी जायचं असून, ते आपल्या मित्राला देखील सोबत येण्याचा आग्रह करत आहेत. ते म्हणतात, "मला कलकत्त्याला शूटिंगला जायचंय, एका पंजाबी फिल्मसाठी. आज दुपारी पुण्यावरून निघायचं आहे. तिकडे येतोस का? तीन दिवस राहायचंय. मग सुनेला सांग, माझ्या मोबाईलवर आधारकार्ड पाठवायला आणि तू येणार का नाही, ते मला अर्ध्या तासात सांग." या साध्या संवादातूनही सयाजी शिंदे यांची मैत्री आणि दिलदारपणा सहज लक्षात येतो.
advertisement
( थिएटरसाठी मुंबईत आले, हिंदी, साऊथमध्ये रुळले; 22 वर्षांनी सयाजी शिंदेंचं मराठी नाटकात कमबॅक )
50 वर्षांनंतर भेट – जुन्या आठवणींना उजाळा
व्हिडीओच्या पुढच्या भागात सयाजी आणि त्यांचा मित्र प्रत्यक्ष भेटतात. जुन्या आठवणींना उजाळा देताना सयाजी म्हणतात, "सातवीतला मित्र आता भेटतोय. जवळपास 50 वर्ष झाली. काय करतोस आता? आम्ही आता विमानाने चाललोय पहिल्यांदा! त्यांचा हा संवाद ऐकून अनेक नेटकरी भावूक झाले आहेत आणि त्यांचं भरभरून कौतुक करत आहेत.
सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
सयाजी शिंदेंच्या या साधेपणाने आणि जुन्या मित्रांविषयी असलेल्या प्रेमाने चाहत्यांना भारावून टाकलं आहे. सोशल मीडियावर अनेकांनी तोंडभरून कौतुक केलं आहे. एका चाहत्यानं लिहिलंय, "माणसातला देवमाणूस!" दुसऱ्यानं लिहिलंय, "आजकाल मुलगा मोठा अधिकारी झाला तरी बापाला विचारत नाही, पण हा माणूस 50 वर्ष जुने मित्र जपतो." आणखी एकाने लिहिलंय, "लोक सेलिब्रिटी झाल्यावर जुन्या मित्रांना विसरतात, पण सयाजी सर स्वतः फोन करून त्याला भेटायला बोलावतात, हेच त्यांची खरी मोठेपणाची ओळख आहे."एकाने लिहिलंय, "खरा कलाकार तोच, जो श्रीमंत-गरीब असा भेदभाव न करता नातं टिकवतो."
सयाजी शिंदे – जमिनीशी जोडलेला कलाकार
सयाजी शिंदे हे केवळ उत्कृष्ट अभिनेतेच नाही, तर एक दिलदार आणि जमिनीशी जोडलेला माणूस आहेत. त्यांनी आपल्या मित्रांसोबत असलेलं नातं 50 वर्षांनंतरही तसंच जपलं आहे, हे पाहून प्रेक्षक भारावले आहेत. त्यांचा हा दिलदारपणा खरंच प्रेरणादायी आहे.
