नितीन चंद्रकांत देसाई आणि प्रसिद्ध कवी ना.धो.महानोर या दोघांसोबत सोनाली कुलकर्णीने एक फोटो शेअर केला आहे. 'अजिंठा' या सिनेमात सोनालीने या दोघांसोबत काम केलं होतं. सोनालीच्या 'अजिंठा' या चित्रपटाचं दिग्दर्शन नितीन चंद्रकांत देसाई यांनी केलं होतं. हा चित्रपट त्यांच्याच 'एन.डी स्टुडिओज' मध्ये संपूर्णपणे शूट करण्यात आला होता. तर या चित्रपटाची कथा ना. धो. महानोर यांच्या 'अजिंठा' या पुस्तकावर आधारित होती. आता अवघ्या ४८ तासांच्या आत अजिंठा या चित्रपटाशी संबंधित दोन व्यक्तींनी या जगातून निरोप घेतला. दोघांच्याही निधनाच्या बातम्या ऐकून सोनाली हादरली आहे. तिने या दोघांविषयी एक पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत.
advertisement
सई ताम्हणकरचं पहिलं प्रेम होता हा अभिनेता; पहिल्यांदाच त्याच्यासोबत काम करताना झाली अशी फजिती
सोनालीनं या पोस्टमध्ये लिहिलंय की, 'कालच्या धक्क्यातून अजून सावरतां आलं नाही आणि आज ही आणखी एक दुःखद बातमी आली… नितीन देसाईंनंतर…ना.धो.महानोर…..असा कसा हा नियतीचा खेळ ठरावा…! माझ्या आयुष्यात ज्यांनी “अजिंठा” आणला असे #NitinDesai आणि या महाकाव्याचे जनक #NaDhoMahanor आज आपल्यात नाही, पण त्यांच्या कलाकृतीं अजारामर रहातील...आपल्याला आयुष्यभर उर्जा देत रहातील हे नक्की...'
नितीन देसाई यांच्याविषयी ती पुढे म्हणाली, '#NitinChandrakantDesai यांचं असं जाणं जिवाला चटका लावून जाणारं आहे. त्यांचं कामाबद्दल, कलेबद्दलचं प्रेम, वेड, हे खूप काही शिकवून गेलं. त्यांचं कला विश्वातलं कार्य हे अभिमानास्पद आहेच आणि ते पुढील अनेक वर्ष कलाकारांना प्रेरणादायी ठरेलच… #respect #Padmashri #NamdeoDhondoMahanor यांना #Ajintha या चित्रपटाच्या निमित्ताने भेटण्याचा योग आला होता.. त्यांचं “अजिंठा” नामक स्वप्न पडद्यावर साकारण्याचं भाग्य लाभलं''
तर ना. धो. महानोर यांच्याविषयी सोनालीने लिहिलंय कि, ''ना रानकविता आज खऱ्या अर्थाने ओसाड झाल्या.. घन ओथंबून येती.. हे शब्दांत व्यक्त करणारे ना.धो. महानोर आज इहलोकीच्या प्रवासाला निघून गेले. रानापासून मनापर्यंत पोहचलेला हा कवी माणूस. “जैत रे जैत” ते “अजिंठा” ची गाणी ऐकताना महानोर सर तुमची आठवण येत राहील... भावपूर्ण श्रद्धांजली''
