'चक दे इंडिया!' फेम या अभिनेत्रीने केवळ साबणच नाही, तर अंघोळीनंतरचे तिचे विधीसुद्धा खूप वेगळे आहेत. विद्याच्या म्हणण्यानुसार, ती अनेकदा साबणाऐवजी साधे पाणी, किंवा कधीकधी गुलाबपाणी किंवा बेसनचे उटणे वापरते.
पण इतकंच नाही, अंघोळीनंतर ती एक व्हिज्युअलायझेशन तंत्र वापरते. यात ती तिच्यातील नकारात्मक ऊर्जा धुऊन साफ होत असल्याची कल्पना करते. सुमारे ३० सेकंद ती हे सकारात्मक विचार स्वतःला सांगते.
advertisement
शॉकिंग! अक्षय कुमारच्या हिरोईनला झालं तरी काय? हॉस्पिटलमधून शेअर केला PHOTO, म्हणते 'लवकरच मी...'
सायन्स काय सांगते?
विद्या मालवदेच्या मते, अनेक लोकांना रोज साबण वापरण्याची गरजच नसते. ती एका अभ्यासाचा संदर्भ देत म्हणाली, "२०२४ मध्ये झालेल्या एका संशोधनात असे दिसून आले आहे की, फक्त पाण्याने आंघोळ करणाऱ्या आणि क्लीन्झर वापरणाऱ्या लोकांमध्ये त्वचेच्या संसर्गात फारसा फरक आढळला नाही."
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, यामागे त्वचेचा नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवणे हे मुख्य कारण आहे. रोज साबण वापरल्याने त्वचा रुक्ष होते, कारण साबण शरीरातील नैसर्गिक तेल काढून टाकतो. पाणी वापरल्याने त्वचेचे नैसर्गिक तेल तसेचच्या तसेच राहते, ज्यामुळे त्वचा लवचिक, हायड्रेटेड आणि मुलायम राहते.
मायक्रोबायोमचा फायदा
त्वचेवर नैसर्गिकरित्या अस्तित्वात असलेल्या बॅक्टेरिया आणि बुरशीच्या समुदायाला 'स्किन मायक्रोबायोम' (Skin Microbiome) म्हणतात. जास्त साबण वापरल्यास हे नैसर्गिक संतुलन बिघडते. हे मायक्रोबायोम संतुलित राहिल्यास, त्वचेचा नैसर्गिक पीएच (pH) आणि रोगप्रतिकारशक्ती टिकून राहते, ज्यामुळे त्वचा मऊ आणि अधिक चमकदार दिसते.
तथापि, जास्त घाम येणाऱ्या, प्रदूषण असलेल्या शहरात राहणाऱ्या लोकांसाठी, तसेच काखेखालील आणि पायांसारख्या भागांसाठी आजही साबण किंवा क्लीन्झर आवश्यक आहे, असेही तज्ज्ञ सांगतात.